शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
3
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
4
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
5
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
6
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
7
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
8
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
9
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
10
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
11
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
12
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
13
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
14
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
15
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
16
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
17
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
18
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
19
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
20
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 21:07 IST

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणाऱ्या राहुल गांधींवर निर्मला सीतारामन यांचा पलटवार.

Parliament Session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता मंगळवारी(दि.30) सीतारामन यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "अर्थसंकल्प तयार करणारे आणि हलवा समारंभात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणे, हे समाजाला अनेक वर्गात विभागण्याचे षडयंत्र आहे. राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी समाजातील किती  लोकांना स्थान मिळाले?" अशी विचारणा अर्थमंत्र्यांनी केली.

2013-14 मध्ये अधिकाऱ्यांची जात का विचारली नाही?सीतारामन पुढे म्हणतात, "हा फोटो इव्हेंट कधीपासून बनला? 2013-14 मध्येही अर्थसंकल्पापूर्वी हलवा समरांभ झाला होता. तेव्हा कोणी अधिकाऱ्यांची जात विचारली होती का? आता अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांची जात विचारून लोकांमध्ये फूट का टाकताय? मिंटो रोडवर जेव्हा बजेट पेपर छापले जायचे, तेव्हापासून हा सोहळा सुरू आहे. बजेटची तयारी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडूनच हलवा तयार केला जातो, ही भारतीय परंपरा आहे," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

अर्थमंत्री इथेच थांबल्या नाहीत, तर त्यांनी राहुल आणि काँग्रेसलाच उलट प्रश्न केला. त्या म्हणाल्या की, "पूर्वीची काँग्रेस सरकारे आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यासारखे पंतप्रधानदेखील आरक्षणाचे मोठे टीकाकार होते. आता राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील किती लोकांना स्थान देण्यात आले आहे? हे काँग्रेसने सांगावे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी काय म्हटले होते?सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत देशाचा अर्थसंकल्प बनवण्याचे काम 20 अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र सहभागी अधिकाऱ्यांमध्ये केवळ एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे. त्यांच्यामध्ये एकही दलित किंवा आदिवासी नाही, असा दावा केला. तसेच, राहुल यांनी अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या हलवा समारंभाचा हवाला देत या सरकारमध्ये फक्त 2-3 टक्के लोकच हलवा बनवतात आणि तेवढेच लोक खात असल्याचा आरोप केला होता. लोकसभेत हलवा समारंभाचा फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले, या फोटोमध्ये मला कोणताही ओबीसी किंवा आदिवासी किंवा दलित अधिकारी दिसत नाही, असाही आरोप केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस