शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:28 IST

Article 370 & Jammu-Kashmir News: कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे.

नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला होता. (Article 370) तसेच जम्मू-काश्मीरचे लडाख आणि जम्मू काश्मीर असे विभाजनही करण्यात आले होते. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर देशातील अन्य भागांमधील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन घेणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. (only Two people bought land in Kashmir after removing Article 370. The number stated by the Central Government in Parliament)

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर बाहेरील किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न आज संसदेमध्ये केंद्र सरकारला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सरकारने सांगितले की, ऑगस्ट २०१९ पासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये केवळ दोन बाहेरील व्यक्तींनी जमिनीची खरेदी केली आहे, अशी माहिती केंद्राने संसदेत दिली. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,’’जम्मू-काश्मीरमध्ये आता जमीन खरेदी करण्यासाठी लोकांना किंवा सरकारला कुठल्याही प्रकारच्या कठीण समस्येचा सामना करावा लागत नाही आहे’’. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांशिवाय अन्य कुठल्याही राज्यातील व्यक्ती तिथे जमीन खरेदी करू शकत नव्हती. मात्र जेव्हापासून कलम ३७० हटवण्यात आले आहे, तेव्हापासून हा नियम बदलला गेला आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेल्यास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी हा निर्णय घेतला होता. तसेच त्यावेळी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एCentral Governmentकेंद्र सरकार