शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:28 IST

Article 370 & Jammu-Kashmir News: कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे.

नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला होता. (Article 370) तसेच जम्मू-काश्मीरचे लडाख आणि जम्मू काश्मीर असे विभाजनही करण्यात आले होते. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर देशातील अन्य भागांमधील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन घेणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. (only Two people bought land in Kashmir after removing Article 370. The number stated by the Central Government in Parliament)

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर बाहेरील किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न आज संसदेमध्ये केंद्र सरकारला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सरकारने सांगितले की, ऑगस्ट २०१९ पासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये केवळ दोन बाहेरील व्यक्तींनी जमिनीची खरेदी केली आहे, अशी माहिती केंद्राने संसदेत दिली. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,’’जम्मू-काश्मीरमध्ये आता जमीन खरेदी करण्यासाठी लोकांना किंवा सरकारला कुठल्याही प्रकारच्या कठीण समस्येचा सामना करावा लागत नाही आहे’’. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांशिवाय अन्य कुठल्याही राज्यातील व्यक्ती तिथे जमीन खरेदी करू शकत नव्हती. मात्र जेव्हापासून कलम ३७० हटवण्यात आले आहे, तेव्हापासून हा नियम बदलला गेला आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेल्यास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी हा निर्णय घेतला होता. तसेच त्यावेळी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एCentral Governmentकेंद्र सरकार