शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:28 IST

Article 370 & Jammu-Kashmir News: कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे.

नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला होता. (Article 370) तसेच जम्मू-काश्मीरचे लडाख आणि जम्मू काश्मीर असे विभाजनही करण्यात आले होते. दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर देशातील अन्य भागांमधील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन घेणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. (only Two people bought land in Kashmir after removing Article 370. The number stated by the Central Government in Parliament)

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर बाहेरील किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न आज संसदेमध्ये केंद्र सरकारला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सरकारने सांगितले की, ऑगस्ट २०१९ पासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये केवळ दोन बाहेरील व्यक्तींनी जमिनीची खरेदी केली आहे, अशी माहिती केंद्राने संसदेत दिली. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,’’जम्मू-काश्मीरमध्ये आता जमीन खरेदी करण्यासाठी लोकांना किंवा सरकारला कुठल्याही प्रकारच्या कठीण समस्येचा सामना करावा लागत नाही आहे’’. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ लागू होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांशिवाय अन्य कुठल्याही राज्यातील व्यक्ती तिथे जमीन खरेदी करू शकत नव्हती. मात्र जेव्हापासून कलम ३७० हटवण्यात आले आहे, तेव्हापासून हा नियम बदलला गेला आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेल्यास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी हा निर्णय घेतला होता. तसेच त्यावेळी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एCentral Governmentकेंद्र सरकार