शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कलम ३७० रद्द झाल्यानंतर किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली? गृह मंत्रालयानं लोकसभेत दिली सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:14 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात खरंच काश्मीर बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता आली आहे का? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात खरंच काश्मीर बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता आली आहे का? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आलं आहे. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत काश्मीरबाहेरील एकूण ३४ जणांनी या केंद्रशासित प्रदेशात जमीन खरेदी केल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आली आहे. या संपत्ती जम्मू, रियासी, उधमपूर आणि केंद्र शासित प्रदेशातील गांदरबल जिल्ह्यातील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए लागू असताना या प्रदेशात इतर राज्यातील रहिवासी व्यक्तीला जमीन खरेदी करण्याची परवानही नव्हती. पण जेव्हापासून जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आलं आणि कलम ३७० हटवण्यात आलं तेव्हापासून या प्रदेशात कोणताही व्यक्ती जमीन खरेदी करण्यास मुक्त झाला. 

केंद्र सरकारनं ५ ऑगस्ट २०१९ मध्ये महत्वाचा निर्णय घेत जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगवेगळं केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आलं. कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार प्राप्त झाले होते. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र ध्वज आणि संविधान लागू होतं. संरक्षण, परदेश आणि संचार विषय वगळता इतर सर्व कायदे बनवण्यासाठी राज्याची परवानगी आवश्यक होती. इतकंच नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व होतं. इतर राज्यातील लोक जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हते. 

सौदीच्या तीन कंपन्यांची मोठी गुंतवणूकउद्योग व वाणिज्य विभाग आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे मुख्यसचिव रंजन प्रकाश ठाकूर यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण बदलत आहे. सौदी अरेबियातील तीन कंपन्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. यात एमआर ग्रूप जम्मूच्या प्रदर्शनी मैदान आणि श्रीनगर येथील बादामीबाग येथे दोन मल्टीपर्पज आयटी टॉवर उभारणार आहे. यात सर्व प्रकारच्या कंपन्या असणार आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय