शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

"आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:40 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा रोखठोक सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप व आम आदमी पार्टीदरम्यान चांगलीच जुंपली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप काश्मिरी पंडितांच्या पलायनावरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन केले, असा रोखठोक सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला. 

द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट यूट्यूबवर टाकावा आणि या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी खर्च करावी, अशी सूचनाही केजरीवाल यांनी पुन्हा केली आहे. चित्रपटावरील त्यांची टिप्पणी आणि भाजपाच्या टीकेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत कश्मिरी पंडितांनी केलेल्या पलायनानंतर केंद्रात गेल्या आठ वर्षांसह १३ वर्षे भाजपाचे सरकार होते. या अवधीत किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यात आले? काश्मिरी पंडितांचे एक तरी कुटुंब काश्मीरला परतले का? काश्मीर पंडितांच्या घर वापसीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

अनुपम खेर यांचा पलटवार‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीवर अभिनेता अनुपम खेर भडकले आहेत. काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर केजरीवाल विधानसभेत बोलताना विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका अनुपम खेर यांनी केली आहे.खेर पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना भाजप किंवा पंतप्रधानांना बोलायचे असल्यास त्यांनी थेट त्यांच्याशी बोलले पाहिजे होते. नाहक आमच्या चित्रपटाला मध्ये आणत हा प्रचाराच्या धाटणीचा चित्रपट असल्याचे म्हणणे लाजीरवाणे आहे. केजरीवाल यांनी चित्रपट पाहिलेला नाही. विधानसभेत ते विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते. केजरीवालांना घरे-दारे सोडून परागंदा झालेल्या लाखो काश्मिरी हिंदूंबद्दल  काही वाटत नाही. प्रत्येक भारतीयाने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघावा आणि केजरीवाल यांच्या असंवदेनशीलपणाला सडेतोड उत्तर द्यावे, हीच माझी केजरीवाल यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया होय.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स