शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

"आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:40 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा रोखठोक सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप व आम आदमी पार्टीदरम्यान चांगलीच जुंपली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप काश्मिरी पंडितांच्या पलायनावरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन केले, असा रोखठोक सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला. 

द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट यूट्यूबवर टाकावा आणि या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी खर्च करावी, अशी सूचनाही केजरीवाल यांनी पुन्हा केली आहे. चित्रपटावरील त्यांची टिप्पणी आणि भाजपाच्या टीकेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत कश्मिरी पंडितांनी केलेल्या पलायनानंतर केंद्रात गेल्या आठ वर्षांसह १३ वर्षे भाजपाचे सरकार होते. या अवधीत किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यात आले? काश्मिरी पंडितांचे एक तरी कुटुंब काश्मीरला परतले का? काश्मीर पंडितांच्या घर वापसीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

अनुपम खेर यांचा पलटवार‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीवर अभिनेता अनुपम खेर भडकले आहेत. काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर केजरीवाल विधानसभेत बोलताना विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका अनुपम खेर यांनी केली आहे.खेर पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना भाजप किंवा पंतप्रधानांना बोलायचे असल्यास त्यांनी थेट त्यांच्याशी बोलले पाहिजे होते. नाहक आमच्या चित्रपटाला मध्ये आणत हा प्रचाराच्या धाटणीचा चित्रपट असल्याचे म्हणणे लाजीरवाणे आहे. केजरीवाल यांनी चित्रपट पाहिलेला नाही. विधानसभेत ते विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते. केजरीवालांना घरे-दारे सोडून परागंदा झालेल्या लाखो काश्मिरी हिंदूंबद्दल  काही वाटत नाही. प्रत्येक भारतीयाने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघावा आणि केजरीवाल यांच्या असंवदेनशीलपणाला सडेतोड उत्तर द्यावे, हीच माझी केजरीवाल यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया होय.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स