शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

डिजिटल इंडियाचे स्वप्न विजेअभावी साकारणार कसे?

By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST

देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज

नवी दिल्ली : देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज याने शुक्रवारी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला माणेकशॉ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यावर मोदींनी २०२२ पर्यंत प्रत्येक गावात, प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, अशी ग्वाही दिली. त्यांनी देशभरातील विद्यार्थी, शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना त्यांच्या रोखठोक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. अनेकदा गुगली टाकत त्यांना हसवले, तर कधी ते आपल्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले. देश २०२२ साली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून त्यावेळी प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, असे आश्वासन त्यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधताना दिले. सध्या १८ हजार गावांमध्ये वीज नाही. येत्या एक हजार दिवसांमध्ये या गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत. डिजिटल इंडियाचा ‘मार्च ’रोखला जाऊ शकत नाही. सौर ऊर्जेचा वापर करीतही हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था) मोदींनी देशभरातील ८०० विद्यार्थी आणि दिल्लीच्या विविध शाळांमधील ६० शिक्षकांशी सुमारे १०५ मिनिटे संवाद साधला. नऊ राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले वक्ता कसे बनलात? तुमच्या कपड्यांचे फॅशन डिझायनर कोण आहेत? कोणता खेळ आवडतो? यासारखे बालसुलभ प्रश्न विचारले. प्रश्न : योगदिन म्हणून २१ जूनचीच निवड का? उत्तर : हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा दिवस आहे. सूर्य हा ऊर्जेचा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्रोत असून त्या दिवशी साहजिकच सर्वाधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे या दिवसाची निवड केली. अनेकांनी याबाबत प्रश्न विचारले; मात्र प्रथमच मी त्याबाबत खुलासा करीत आहे.प्रश्न : चांगले वक्ते कसे बनलात? उत्तर : दिल्लीच्या पुष्पविहारमधील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया सिंग हिच्या या प्रश्नावर मोदी म्हणाले की, चांगला वक्ता बनण्यासाठी आधी चांगला श्रोता बनण्याची आवश्यकता आहे. कोण काय म्हणेल, कुणी हसेल काय याची चिंता नको. हसणार असतील तर हसू द्या, मात्र जे सांगायचे ते आत्मविश्वासाने बोला. तुम्ही तथ्य आणि माहितीच्या आधारावर बोलाल तेव्हा चांगले वक्ते बनाल. गुगल, यू-ट्यूबवर जगभरातील मान्यवरांची चांगली भाषणे असतात.