शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:36 IST

Avimukteshwaranand saraswati On pahalgam terror attack: काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दहशतवादाला धर्म असतो, असे म्हटले आहे. 

Pahalgam terror attack Latest Update: "आपल्या देशातील मोठमोठे नेते वारंवार हे म्हणत असतात की, दहशतवादाचा कोणताही धर्म नाही. पण, या घटनेने सिद्ध केलं आहे की, दहशतवादाला धर्म असतो. नेत्यांनी आता असे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. दहशतवाद्यांनी धर्म विचारून आणि एका विशिष्ट धर्माच्या लोकांना मारले', असा संताप ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मध्य प्रदेशातील सिवनी येथे बोलत असताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले. 'असं काम राक्षसांशिवाय कुणीच करू शकत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना राक्षस म्हणणं सुरू केले पाहिजे', असे ते म्हणाले. 

'हिंदूंनी यातून धडा घ्यावा आणि पराक्रमासाठी तयार राहावं'  

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, 'हिंदूंनी या घटनेतून धडा घ्यायला हवा आणि आपल्या पूर्वजांसारखा पराक्रम दाखवण्यासाठी तयार रहायला हवे. हिंदूंनी या घटनेतून शिकण्याची गरज आहे. हिंदूंना आव्हान दिलं जात आहे. आपली ओळख समजून घ्या आणि पूर्वजांनी केलेला पराक्रम पुन्हा करण्यासाठी तयार रहावं. कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?", असा संतप्त सवाल त्यांनी केला. 

अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी सरकारवरही डागली तोफ

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. "ज्या लोकांनी दावा केला की, काश्मिरमध्ये सर्व काही व्यवस्थित झाले आहे. कलम ३७० हटवण्यात आले आहे आणि स्वर्ग भूमीचा आनंद घ्या. त्यांच्यावर दाव्यावर विश्वास ठेवूनच लोक तिथे गेले होते", असे ते म्हणाले. 

वाचा >>दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर

"सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे की, त्यांच्याकडून कुठे चूक झाली. घटनेनंतर प्रशासन त्यांच्या धाडसाचे ढोल बडवत आहे, पण घटना घडली त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठे होती?", असा सवाल अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला केला आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाHinduहिंदूTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी