शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:34 IST

Supreme Court On Modi Government: ८१ कोटी लोकांना मोफत रेशन देत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या असे म्हणत कान पिळले. 

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (९ डिसेंबर) झालेल्या एका सुनावणीत केंद्र सरकारला फटकारले. केंद्र सरकारकडून मोफत दिल्या जात असलेल्या सवलतींबद्दल प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला की, मोफत गोष्टी कधीपर्यंत देणार आहात? कोविडच्या साथीनंतर मोफत रेशन मिळणाऱ्या स्थलांतरित मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशा शब्दात न्यायालयाने सरकारचे कान टोचले. 

न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंठपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, ८१ कोटी लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत मोफत रेशन दिले जात आहे. 

"कर भरणारेच बाकी आहेत"

सर्वोच्च न्यायालयाने यावर आश्चर्य व्यक्त केले आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर ऐश्वर्या भाटी यांना प्रश्न विचारला की, "याचा अर्थ आता फक्त कर भरणारे लोकच बाकी आहेत." 

एका स्वयंसेविक संस्थेने ही याचिका दाखल केली असून, त्यांच्यावतीने बाजू मांडताना वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितले की, 'अशा स्थलांतरित मजुरांना मोफत रेशन दिलं गेलं पाहिजे, ज्यांची ई श्रमिक पोर्टलवर नोंदणी आहे. न्यायालय म्हणाले, मोफत गोष्टी कधीपर्यंत दिल्या पाहिजे? आम्ही या स्थलांतरित मजुरांसाठी रोजगाराच्या संधी आणि त्यांच्यात रोजगाराच्या क्षमता तयार करण्याबद्दल काम करायला नको का?, असे सवाल न्यायालयाने केले. 

केंद्राकडून मोफत रेशन देण्याचे आदेश 

प्रशांत भूषण यांनी न्यायालयात सांगितले की, स्थलांतरित मजुरांना रेशन कार्ड देण्याचे आदेश न्यायालयाने वेळोवेळी सर्व राज्य, केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. जेणेकरून त्यांना केंद्राच्या मोफत रेशन योजनेचा लाभ होईल. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत, पण, त्यांची नोंदणी ई श्रमिक पोर्टलवर आहे, त्यांनाही रेशन दिले जावे, असेही न्यायालयाने अलिकडेच सांगितले आहे. 

त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले, "ही समस्या अशी आहे की, आम्ही राज्यांना आदेश दिले की, स्थलांतरित मजुरांना रेशन द्या; तर ते कोणीच इथे दिसणार नाहीत. ते पळून जातील. राज्यांना माहिती आहे की, ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते फक्त रेशन कार्ड देतील." 

"आपण केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये मतभेद निर्माण करू नये, कारण असे झाले तर परिस्थिती आणखी कठीण होईल", असेही न्यायालयाने यावेळी म्हटले. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय