शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:34 IST

Supreme Court On Modi Government: ८१ कोटी लोकांना मोफत रेशन देत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या असे म्हणत कान पिळले. 

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (९ डिसेंबर) झालेल्या एका सुनावणीत केंद्र सरकारला फटकारले. केंद्र सरकारकडून मोफत दिल्या जात असलेल्या सवलतींबद्दल प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला की, मोफत गोष्टी कधीपर्यंत देणार आहात? कोविडच्या साथीनंतर मोफत रेशन मिळणाऱ्या स्थलांतरित मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशा शब्दात न्यायालयाने सरकारचे कान टोचले. 

न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंठपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, ८१ कोटी लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत मोफत रेशन दिले जात आहे. 

"कर भरणारेच बाकी आहेत"

सर्वोच्च न्यायालयाने यावर आश्चर्य व्यक्त केले आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर ऐश्वर्या भाटी यांना प्रश्न विचारला की, "याचा अर्थ आता फक्त कर भरणारे लोकच बाकी आहेत." 

एका स्वयंसेविक संस्थेने ही याचिका दाखल केली असून, त्यांच्यावतीने बाजू मांडताना वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितले की, 'अशा स्थलांतरित मजुरांना मोफत रेशन दिलं गेलं पाहिजे, ज्यांची ई श्रमिक पोर्टलवर नोंदणी आहे. न्यायालय म्हणाले, मोफत गोष्टी कधीपर्यंत दिल्या पाहिजे? आम्ही या स्थलांतरित मजुरांसाठी रोजगाराच्या संधी आणि त्यांच्यात रोजगाराच्या क्षमता तयार करण्याबद्दल काम करायला नको का?, असे सवाल न्यायालयाने केले. 

केंद्राकडून मोफत रेशन देण्याचे आदेश 

प्रशांत भूषण यांनी न्यायालयात सांगितले की, स्थलांतरित मजुरांना रेशन कार्ड देण्याचे आदेश न्यायालयाने वेळोवेळी सर्व राज्य, केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. जेणेकरून त्यांना केंद्राच्या मोफत रेशन योजनेचा लाभ होईल. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत, पण, त्यांची नोंदणी ई श्रमिक पोर्टलवर आहे, त्यांनाही रेशन दिले जावे, असेही न्यायालयाने अलिकडेच सांगितले आहे. 

त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले, "ही समस्या अशी आहे की, आम्ही राज्यांना आदेश दिले की, स्थलांतरित मजुरांना रेशन द्या; तर ते कोणीच इथे दिसणार नाहीत. ते पळून जातील. राज्यांना माहिती आहे की, ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते फक्त रेशन कार्ड देतील." 

"आपण केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये मतभेद निर्माण करू नये, कारण असे झाले तर परिस्थिती आणखी कठीण होईल", असेही न्यायालयाने यावेळी म्हटले. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय