शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:23 IST

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती.

नवी दिल्ली - 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना टार्गेट करत एअर स्ट्राईक केलं. नुकतान भारतीय हवाई दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या एअर स्ट्राईकला कोड नेम होतं ते ऑपरेशन बंदर. 

ज्याप्रकारे हनुमानाने रावणाच्या लंकेत घुसून लंकादहन केलं होतं. त्याच रणनीतीवर या हल्ल्याची योजना आखली गेली. या हल्ल्याची गुप्तता पाळण्यासाठी या हल्ल्याला ऑपरेशन बंदर हे सांकेतिक नावं दिलं होतं अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांनी दिली होती. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या हल्ल्याच्या इनसाइड स्टोरीची बातमी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर असा डाव साधला होता की शेवटपर्यंत पाकिस्तानला याची कल्पना नव्हती की, भारताचं टार्गेट बहावलपूर नाही तर बालकोट आहे. 

Image result for ऑपरेशन बंदर

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच भारताने यूएवी लॉन्च केलं. यूएवीचा आकारा जास्त मोठा नव्हता. पाकिस्तानला वाटलं भारत पुन्हा एकदा त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करायला येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने त्यांची एफ 16 ही दोन लढाऊ विमाने भारताच्या सीमेच्या दिशेने रवाना केली. याच दरम्यान काश्मीरच्या दिशेने 6 जगुआर विमानांनी उड्डाणं घेतली. पाकिस्तानला ऑपरेशनचं गांभीर्य दाखविण्यासाठी भारताने ही  6 जगुआर विमाने उडवली. या विमानाची दिशा बहावलपुरकडे जाण्यासाठी निघाल्याचं पाकिस्तानला भासविण्यात आलं. बहावलपुरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. 

पाकिस्तानी हवाई दलाला वाटलं की, भारताची विमानं बहावलपुरच्या दिशेने पुढे येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली एफ 16 विमाने बहावलपुरच्या दिशेने पाठविली. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी भारताने रचलेला तो डाव होता. या चक्रव्युहमध्ये पाकिस्तान फसला आणि त्याचवेळी ग्वालियर येथून उड्डाण घेतलेली लढाऊ विमाने बालकोटला पोहचली आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केलं. या ऑपरेशन बंदरमध्ये 5 ते 6 लढाऊ विमाने होती. ज्यांनी स्पाइस 2000 या इज्राईल बॉम्बचा हल्ल्यासाठी वापर केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाकडून 27 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर जवानांच्या तळावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानIndiaभारत