शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:23 IST

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती.

नवी दिल्ली - 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना टार्गेट करत एअर स्ट्राईक केलं. नुकतान भारतीय हवाई दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या एअर स्ट्राईकला कोड नेम होतं ते ऑपरेशन बंदर. 

ज्याप्रकारे हनुमानाने रावणाच्या लंकेत घुसून लंकादहन केलं होतं. त्याच रणनीतीवर या हल्ल्याची योजना आखली गेली. या हल्ल्याची गुप्तता पाळण्यासाठी या हल्ल्याला ऑपरेशन बंदर हे सांकेतिक नावं दिलं होतं अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांनी दिली होती. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या हल्ल्याच्या इनसाइड स्टोरीची बातमी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर असा डाव साधला होता की शेवटपर्यंत पाकिस्तानला याची कल्पना नव्हती की, भारताचं टार्गेट बहावलपूर नाही तर बालकोट आहे. 

Image result for ऑपरेशन बंदर

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच भारताने यूएवी लॉन्च केलं. यूएवीचा आकारा जास्त मोठा नव्हता. पाकिस्तानला वाटलं भारत पुन्हा एकदा त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करायला येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने त्यांची एफ 16 ही दोन लढाऊ विमाने भारताच्या सीमेच्या दिशेने रवाना केली. याच दरम्यान काश्मीरच्या दिशेने 6 जगुआर विमानांनी उड्डाणं घेतली. पाकिस्तानला ऑपरेशनचं गांभीर्य दाखविण्यासाठी भारताने ही  6 जगुआर विमाने उडवली. या विमानाची दिशा बहावलपुरकडे जाण्यासाठी निघाल्याचं पाकिस्तानला भासविण्यात आलं. बहावलपुरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. 

पाकिस्तानी हवाई दलाला वाटलं की, भारताची विमानं बहावलपुरच्या दिशेने पुढे येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली एफ 16 विमाने बहावलपुरच्या दिशेने पाठविली. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी भारताने रचलेला तो डाव होता. या चक्रव्युहमध्ये पाकिस्तान फसला आणि त्याचवेळी ग्वालियर येथून उड्डाण घेतलेली लढाऊ विमाने बालकोटला पोहचली आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केलं. या ऑपरेशन बंदरमध्ये 5 ते 6 लढाऊ विमाने होती. ज्यांनी स्पाइस 2000 या इज्राईल बॉम्बचा हल्ल्यासाठी वापर केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाकडून 27 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर जवानांच्या तळावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानIndiaभारत