शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:50 IST

Supreme Court News: भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान, भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानावरून अडचणीत आले आहेत. भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं काय कळलं. जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं बोललं नसतं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांना सुनावले.

चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, असे एका माजी लष्करी अधिकाऱ्याने मला सांगितले असा दावा राहुल गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी २०२३ साली भारत जोडो यात्रेदरम्यान केला होता. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. तसेच त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या मानहानीच्या खटल्याला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ‘’चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं काय कळलं? असा सवाल राहुल गांधी यांना विचारला. तसेच जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं बोलला नसता, असेही त्यांना सुनावले.

तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग तुम्ही अशा गोष्टी का बोलता? हे प्रश्न तुम्ही संसदेत विचारले पाहिजेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावरराहुल गांधी यांनी संसदेत बोलता यावं म्हणून निवडणूक लढवलेली नाही. कलम १९ (१) (ए) राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतं, असे  राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्यावतीने पुढे सांगितले की, ‘’राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. या प्रकरणी दखल घेतली जाण्यापूर्वी त्यांना कुठलाही नैसर्गिक न्याय दिला गेलेला नाही’’. सिंघवी पुढे म्हणाले की, खंडपीठाने ज्या भावनेने हा प्रश्न विचारला आहे, त्या भावनेची मला जाणीव आहे. मात्र इथे कुठलाही नैसर्गिक न्याय किंवा सुनावणी नाही आहे, याबाबत एकमत आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तुम्ही हा प्रश्न उच्च न्यायालयाल का उपस्थित केला नाही. तुम्ही तर वेगळ्याच मार्गाने पुढे गेलात. यावर सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी हे काही वादग्रस्त व्यक्ती नाहीत. तसेच ते पीडितही नाही आहेत. यावरही तुम्ही तुमच्या एलएसपीकडून मत मागितलं नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटिस बजावली आहे. तसेच या प्रकरणी पुढील कारवाईला स्थगिती दिली आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयindia china faceoffभारत-चीन तणाव