शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:50 IST

Supreme Court News: भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान, भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानावरून अडचणीत आले आहेत. भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं काय कळलं. जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं बोललं नसतं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांना सुनावले.

चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, असे एका माजी लष्करी अधिकाऱ्याने मला सांगितले असा दावा राहुल गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी २०२३ साली भारत जोडो यात्रेदरम्यान केला होता. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. तसेच त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या मानहानीच्या खटल्याला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ‘’चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं काय कळलं? असा सवाल राहुल गांधी यांना विचारला. तसेच जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं बोलला नसता, असेही त्यांना सुनावले.

तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग तुम्ही अशा गोष्टी का बोलता? हे प्रश्न तुम्ही संसदेत विचारले पाहिजेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावरराहुल गांधी यांनी संसदेत बोलता यावं म्हणून निवडणूक लढवलेली नाही. कलम १९ (१) (ए) राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतं, असे  राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्यावतीने पुढे सांगितले की, ‘’राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. या प्रकरणी दखल घेतली जाण्यापूर्वी त्यांना कुठलाही नैसर्गिक न्याय दिला गेलेला नाही’’. सिंघवी पुढे म्हणाले की, खंडपीठाने ज्या भावनेने हा प्रश्न विचारला आहे, त्या भावनेची मला जाणीव आहे. मात्र इथे कुठलाही नैसर्गिक न्याय किंवा सुनावणी नाही आहे, याबाबत एकमत आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तुम्ही हा प्रश्न उच्च न्यायालयाल का उपस्थित केला नाही. तुम्ही तर वेगळ्याच मार्गाने पुढे गेलात. यावर सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी हे काही वादग्रस्त व्यक्ती नाहीत. तसेच ते पीडितही नाही आहेत. यावरही तुम्ही तुमच्या एलएसपीकडून मत मागितलं नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटिस बजावली आहे. तसेच या प्रकरणी पुढील कारवाईला स्थगिती दिली आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयindia china faceoffभारत-चीन तणाव