शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मंदिरातील विहिरीने कसा घेतला ३६ जणांचा बळी? इंदूरमधील दुर्घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 19:57 IST

Indore Temple Accident: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी झालेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागलं होतं. मंदिरात भक्तिमध्ये गुंग झालेल्या लोकांना ते जिथे उभे होते.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी झालेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे या उत्सवाला गालबोट लागलं होतं. मंदिरात भक्तिमध्ये गुंग झालेल्या लोकांना ते जिथे उभे होते. त्यावेळी आपण जिथे आहोत त्याखाली साक्षात मृत्यू दबा धरून बसलाय, याची कल्पना त्या लोकांना नव्हती. मंदिरात झालेल्या या दुर्घटनेमुळे केवळ मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाल धक्का बसला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३६ जणांचा बळी गेला आहे. 

या दुर्घटनेबाबत स्थानिक रहिवासी शिवशंकर मौर्य यांनी सांगितले की, मंदिर सुमारे ५० वर्षे जुने आहे. तर ही विहीर सुमारे १०० वर्षे जुनी आहे. आधी ही विहीर उघडी होती. सुमारे २५ वर्षांपूर्वी तिच्यावर स्लॅब टाकण्यात आले. त्यानंतर ती विहीर मंदिराचाच एक भाग बनली. हा भाग बेकायदेशीर होता. रामनवमी दिवशी जेव्हा भाविक मोठ्या संख्येने तिथे जमले तेव्हा विहिरीवरील स्लॅब तुटला आणि लोक त्यामध्ये अडकले.  

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रामनवमीनिमित्त येथे हवनाचा कार्यक्रम सुरू होता. हवन संपन्न होताच जेव्हा आरतीसाठी भाविक जमले, त्याचवेळी विहिरीवर टाकलेला स्लॅब तुटला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर इंदूर महानगरपालिकेच्या आयुक्त प्रतिभा पाल यांनी कारवाई करत स्थानिक बिल्डिंग इन्स्पेक्टर आणि बिल्डिंग ऑफिसर यांना निलंबित केलं आहे. तर राज्य सरकारनेही मॅजिस्ट्रेटकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.

इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देऊस्कर यांनी सांगितले की, या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सचिवांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेलेश्वर मंदिरात असलेल्या विहिरीप्रमाणे जेवढ्याही विहिरी आहेत, त्यांची चौकशी करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही.

इंदूरमधील स्नेहनगर परिसरात असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिरात गुरुवारी रामनवमी दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मंदिरामध्ये पूजाविधी सुरू होती. हवन समाप्त झाल्यानंतर जेव्हा लोक पूर्णाहुतीसाठी आपल्या जागेवर उभे राहिले, तेव्हा ही दुर्घटना घडली. त्यांच्या पायाखालील लादी तुटली आणि हे सारे जण विहिरीत पडले. ही लादी जुन्या विहिरीवर काँक्रिट टाकून त्यावर बनवण्यात आली होती.  सुमारे ५० फूट खोल असलेल्या या विहिरीला न भरता त्यावर लिंटर टाकून फरशी बसवण्यात आली होती.  

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश