शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या देशाचं नाव 'भारत' कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:30 IST

एका निमंत्रण पत्रिकेवरील भारत शब्दावरून सध्या राजकारण तापल्याचं दिसतंय

Bharat Name Story:  'इंडिया' नव्हे, भारत..!! पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकण्यावर यापूर्वीही भर देण्यात आला होता, त्यातच आता पुन्हा याबाबत मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकांना 'इंडिया' ऐवजी भारत हे नाव वापरण्याचे आवाहन केले आहे. तशातच, G20 शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख दिसला. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकण्यासंबंधी विधेयक मांडू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भारत देशाच्या नावामागील 'प्रवास' जाणून घेणे आणि समजून घेणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे.

प्राचीन काळापासून आपल्या देशाला वेगवेगळी नावे आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये देशाची वेगवेगळी नावे लिहिली गेली - जंबुद्वीप, भरतखंड, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, आर्यावर्त. त्यानंतरच्या काळातील इतिहासकारांनी हिंद, हिंदुस्थान, भारतवर्ष, भारत अशी नावेही दिली. पण त्यात भारत सर्वाधिक लोकप्रिय ठरले.

भारत आणि भारतवर्ष हे नाव कसे पडले?

याबाबत अनेक दावे केले जातात. वाचूया यासंदर्भात अधिक माहिती-

- विष्णु पुराणात असे आढळून आले आहे की 'भारताच्या सीमा समुद्राच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत पसरलेल्या आहेत. विष्णु पुराण सांगते की ऋषभदेव जेव्हा केवळ गळ्यात उपर्ण बांधून नग्न अवस्थेत जंगलात निघून गेले तेव्हा त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र भरत याला वारसा दिला त्यामुळे या देशाचे नाव भारतवर्ष पडले. आपले संपूर्ण राष्ट्र काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. हे भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे असे म्हटले जाते.

- राजा दुष्यंत आणि महाभारतातील शकुंतलाचा पुत्र भरत याच्या नावावरून देशाचे नाव भारत ठेवण्यात आले, अशी एक मान्यता आहे.

- आणखी एक दावा असा की भरत नावाचा एक चक्रवर्ती सम्राटदेखील होऊन गेला. त्याचा नावलौकिक चहुदिशांना पसरला होता आणि त्याला चार दिशांचा स्वामी मानले जायचे. भरत सम्राटाच्या नावावरून देशाचे नाव ‘भारतवर्ष’ ठेवण्यात आल्याचा दावाही केला जातो. वर्ष म्हणजे संस्कृतमध्ये क्षेत्र किंवा भाग असाही अर्थ होतो.

- पौराणिक युगातील मान्यतेनुसार, भरत या नावाच्या अनेक व्यक्ति होऊन गेल्या ज्यांच्या नावावरून भारत हे नाव पडल्याचे मानले जाते. एक दावा असाही केला जातो की सम्राट भरत याच्या नावामुळेच आपल्या देशाचे नाव 'भारतवर्ष' पडले.

- सर्वात लोकप्रिय मान्यतेनुसार, दशरथपुत्र आणि भगवान श्री राम यांचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावावरून या देशाचे नाव भारत ठेवले गेले. श्री राम चरित मानसनुसार, राम वनवासात गेल्यावर, भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या, पण तो स्वतः विराजमान झाला नाही. त्याचा त्याग आणि निस्सीम प्रेमाने त्याला महान राजा बनवले. त्याच्या नावावरून देशाला भारत हे नाव देण्यात आले.

- नाट्यशास्त्रात उल्लेख असलेल्या भरतमुनींच्या नावावरून देशाचे नाव भारत पडले, अशीही एक धारणा आहे. हे राजर्षी भरताबद्दल देखील सांगितले जाते.

- मत्स्य पुराणात असा उल्लेख आहे की ज्या वराने लोकांना जन्म दिला आणि त्यांची काळजी घेतली त्यामुळे मनुला भरत म्हटले गेले. जैन परंपरेतही भरत नावाचा आधार सापडतो.

टॅग्स :Indiaभारत