शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

किती वाईट! पुतणीच्या लग्नाची वरात येण्यापूर्वी काकाचा मृत्यू; पाठवणीला आजीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:58 IST

आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. या नवरी मुलीने काय करावे...

आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. परंतु, एखाद्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना जर घरच्या दोन लोकांचा मृत्यू झाला तर त्याने काय करायचे? लग्नाचा आनंदही घेता येत नाही आणि दु:खही करता येत नाही अशी परिस्थिती. राजस्थानच्या बुंदीमध्ये असाच एक विदारक प्रसंग घडला आहे. 

एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरु होती. सर्वजण नवरदेवाची वरात यायची वाट पाहत होते. वरात येण्यापूर्वीच नवरीच्या काकांनी हृदयविकाराचा झटका आला. जागीच त्यांचा मृत्यू झाला. सर्व कुटुंबावर शोककळा पसरली. हृदयावर दगड ठेवून नवरीचे लग्न लावण्यात आले. परंतु, हा दु:खाचा डोंगर काही कमी होता की काय तिची पाठवणी करताना तिच्या आजीचा मृत्यू झाला. 

लग्न घरात मृतदेह ठेवणे योग्य नव्हते म्हणून गावकऱ्यांनी काका गोविंद लाला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. वरात आली होती. लग्नाच्या विधीपूर्वीच कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. लग्नविधी उरकले, कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त करत तिची पाठवणीची तयारी केली. परंतु तितक्यात ९० वर्षांची आजी मंगली बाई यांनीही प्राण सोडले.  

टॅग्स :marriageलग्न