शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

लज्जास्पद! रुग्णालयाने दिलं नाही वाहन; हतबल भावाने बाईकवरून नेला बहिणीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:51 IST

खासगी रुग्णालयात वाहन न मिळाल्याने विद्यार्थिनीच्या भावाने मृतदेह बाईकवरून घरी आणला.

उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन न मिळाल्याने एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह बाईकवरून सुमारे 10 किलोमीटरपर्यंत घेऊन जावा लागला. इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थिनीला पेपर चांगला गेला नव्हता. विद्यार्थिनीला याची काळजी वाटत होती, त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. 

खासगी रुग्णालयात वाहन न मिळाल्याने विद्यार्थिनीच्या भावाने मृतदेह बाईकवरून घरी आणला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारवारी नगरपालिकेतील आंबेडकर नगर येथील आहे. 

विद्यार्थिनीला पेपर खराब केला होता, त्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. गुरुवारी विद्यार्थिनीने तिच्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मृताच्या भावाने मृतदेह नेण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडे वाहनाची मागणी केली, मात्र अर्धा तास प्रतीक्षा करूनही वाहन मिळाले नाही. 

भावाने बहिणीचा मृतदेह बाईकवरून नेला. होळीपूर्वी झालेल्या परीक्षेत बहिणीचे काही पेपर चांगले गेले नसल्याचं भावाने सांगितले. त्यामुळे ती तणावात होती. याच कारणावरून तिने हे पाऊल उचलले. आम्ही तिला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात वाहनाची वाट पाहिली, मात्र वाहन न मिळाल्याने मृतदेह बाईकवरून आणण्यात आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"