शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

"इमानदारी हाच मोठा दागिना"; रिक्षावाल्याने परत केली दागिन्यांनी भरलेली बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 16:07 IST

बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय.

ओडिशा राज्यातील बरहमपूरमध्ये एका ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेला ५ रुपयांचा ठोकला काही वेळात गायब झालेला असतो. मात्र, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग या रिक्षावाल्याने प्रवाशाला घरी जाऊन परत केली. इमानदारी हाच खरा दागिना असल्याचं या रिक्षावाल्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. ऑटो चालकाचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रवासी कुटुंबही गहिवरल्याचं पाहायला मिळालं.

बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय. येथील प्रवासात एका कुटुंबाने आपली सोन्याच्या दागिन्यांची बॅग चुकून रिक्षातच ठेवली. सीमांचल येथील कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बहरमपूर येथे आले होते. बरहमपूर येथे पोहोचल्यानंतर ओम बिहार जाण्यासाठी या कुटुंबाने टी. सीमाद्री यांची रिक्षा बुक केली. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी निघून गेले. मात्र, त्यांची एक बॅग रिक्षातच राहिली होती. 

रिक्षाचालक सीमाद्री यांनी जेव्हा ही बॅग पाहिली, तेव्हा या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह काही महत्त्वाचे दस्तावेजही होते. या दस्तावेजवर रिक्षातील प्रवाशांचे नाव आणि रहिवाशी पत्ताही लिहिण्यात आला होता. त्यामुळे, ऑटोचालकाने तात्काळ त्या पत्त्यावर जायचं ठरवलं. प्रवाशांच्या घरी पोहोचून त्यांनी ती बॅग ज्यांची होती, त्यांच्याकडे परत केली. त्यावेळी, प्रवाशांचे नातेवाईक असलेल्या एम. चाकडोला यांनी रिक्षाचालक सीमाद्री यांचे आभार मानले. तसेच, आपण प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केल्याचंही म्हटलं. यावेळी, इमान सबसे बडा होता है, असे सीमाद्री यांनी म्हटलं.