शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Home: घरासाठी पैसे नाहीयेत? सरकार करणार मदत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणार कर्जाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 11:32 IST

Home: प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत देशातील ग्रामीण भागात बांधली जाणारी घरे पैशांच्या कमतरतेमुळे आता अपूर्ण राहणार नाहीत. ही घरे बांधण्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत देशातील ग्रामीण भागात बांधली जाणारी घरे पैशांच्या कमतरतेमुळे आता अपूर्ण राहणार नाहीत. ही घरे बांधण्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.केंद्र सरकारचा ग्रामविकास विभाग यासाठीच्या मसुद्याला अंतिम रूप देत आहे. क्रेडिट गॅरंटी योजनेंतर्गत संबंधितांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. यामध्ये बचत गटांची (एसएचजी) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे कर्ज लाभार्थी बचत गटांच्या हमीवर बँकांकडून घेऊ शकतात.पीएमएवाय अंतर्गत, मार्च २०२४पर्यंत देशात २.७२ कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. या योजनेंतर्गत मैदानी भागातील लाभार्थ्यांना १.२० लाख आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना १.३० लाख रुपये पायाभूत सुविधांची घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार ६०:४०च्या प्रमाणात वाटून घेते. या  योजनेंतर्गत २.४४ कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत.

सर्वात मोठी समस्या काय? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कोरोना महामारीच्या गेल्या दोन वर्षांमध्ये बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ ही लाभार्थींना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पक्क्या घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.  त्यांना या योजनेतून मदत दिली जाईल.

कुठे किती घरांचे लक्ष्य पूर्णसर्वांना घर देण्याच्या योजनेमुळे विशेषत: पुढील १२ महिन्यांत निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये घर बांधणीचे लक्ष्य ८५.७५ टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहेत.

६५ लाख  नवीन घरे दरवर्षीn पीएमएवाय (ग्रामीण) च्या पहिल्या टप्प्यात २०१६ - १७ ते २०१८ - १९ पर्यंत, राज्ये प्रतिवर्षी ३० लाख घरे पूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत.n तथापि, मिशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरवर्षी ६५ लाख घरांची निर्मिती करावी  लागणार आहे.प्रत्येकाला मिळणार घर n पीएमएआय (ग्रामीण) १ एप्रिल २०१६पासून राबविण्यात येत आहे.  n सरकारने मार्च २०२४पर्यंत पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत २,७१,९२,७९५ पक्की घरे पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. n ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १,९६,६२,९६३ घरे पूर्ण झाली आहेत. आता १६ महिन्यांत ७५,२९,८३२ पक्की घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अनुदानामुळे मोठा फायदासर्वां पंतप्रधान आवाज योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. शहरी भागात घर घेतल्यास अनुदान म्हणून २.६९ लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. त्याचा मोठा शहरी भागातील घर खरेदीदारांना झाला आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाHomeसुंदर गृहनियोजनbankबँक