शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:30 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. या कारवाईनंतर गृह मंत्रालय अधिकच सतर्क झाले असून, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये  भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा हल्लाबोल केला. या ऑपरेशननंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. 

गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता बीएएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ सारख्या सर्व प्रमुख निमलष्करी दलाच्या जवानांना पूर्ण दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. यासोबतच, सीमावर्ती भागांमध्ये आता अतिरक्त ताफा तैनात करण्यात येणार आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला!भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान आता चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची धमकी देखील दिली आहे. मात्र, हा निर्णय दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान सीमांवर आता अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय संस्था आणि राज्य पोलिसांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'ने उडवला दहशतवाद्यांचा धुव्वा!ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैनिकांनी पहाटे १.३० वाजता राफेल आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि ९० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक