शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:30 IST

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. या कारवाईनंतर गृह मंत्रालय अधिकच सतर्क झाले असून, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये  भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा हल्लाबोल केला. या ऑपरेशननंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. 

गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता बीएएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ सारख्या सर्व प्रमुख निमलष्करी दलाच्या जवानांना पूर्ण दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. यासोबतच, सीमावर्ती भागांमध्ये आता अतिरक्त ताफा तैनात करण्यात येणार आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला!भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान आता चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची धमकी देखील दिली आहे. मात्र, हा निर्णय दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान सीमांवर आता अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय संस्था आणि राज्य पोलिसांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'ने उडवला दहशतवाद्यांचा धुव्वा!ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैनिकांनी पहाटे १.३० वाजता राफेल आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि ९० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक