शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दलितांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक, गृहमंत्री राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:51 IST

दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) बोथट होण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही, असे स्पष्टिकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिले. भारत बंदच्या दिवशी सोमवारी देशात झालेल्या हिंसाचारात ११ जण ठार झाले. काही ठिकाणी पोलिस व निदर्शकांत चकमकीही झाल्या. त्यासंदर्भात ते निवेदन करीत होते.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) बोथट होण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही, असे स्पष्टिकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिले. भारत बंदच्या दिवशी सोमवारी देशात झालेल्या हिंसाचारात ११ जण ठार झाले. काही ठिकाणी पोलिस व निदर्शकांत चकमकीही झाल्या. त्यासंदर्भात ते निवेदन करीत होते.राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटी कायदा बोथट होण्यासाठी आमच्या सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा या कायद्याचा आढावा घेऊन तो अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. राखीव जागांबाबत अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. पण त्यामध्ये काडीचेही तथ्य नाही. अनुसूचित जाती-जमातींच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या खटल्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत निवेदन करतांना गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, दलितांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक आहे. अनुसूचित जाती जमाती कायदा अधिक मजबूत केला जाईल, हे सरकारचे वचन आहे. मागासवर्गियांच्या आरक्षणाबाबत देशात विनाकारण संभ्रम निर्माण केला जात आहे.कायद्यातील तरतूदींच्या बदलाबाबत सुप्रिम कोर्टाच्या मार्गदर्शक निर्देशांच्या विरोधात देशाच्या दहा राज्यात झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यामुळे मोठफ़ा प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाल्यामुळे संसदेत राजकीय पक्षांमधे अस्वस्थताी होती.दलित व मागसवर्गीयांत अस्वस्थता पसरून, जातीय सलोखा बिघडू नये, याविषयी सर्वांनाच चिंता वाटत होती. त्यामुळे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतल्या हिंसक घटनांचा संदर्भ देत सविस्तर निवेदन केले. केंद्र तसेच विविध राज्य सरकारांनी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली.आजी-माजी आमदारांची घरे दिली पेटवूनजयपूर  - अ‍ॅट्रॉसिटी कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बोथट झाल्याच्या आक्षेप घेत सोमवारी पुकारलेल्या भारत बंदच्या दिवशी राजस्थानातही हिंसक निदर्शने झाली. त्याचा बदला घेण्यासाठी करौलीजवळील हिंडौन येथे निदर्शकांनी मंगळवारी भाजपाचे आमदार राजकुमारी जाटव व काँग्रेसचे माजी आमदार भरौसीलाल जाटव यांची घरे सवर्ण व्यापाऱ्यांनी पेटवली. दलितांचे एक वसतिगृह व एका दलित व्यावसायिकाच्या इमारतीला आग लावली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा