शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

दलितांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक, गृहमंत्री राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:51 IST

दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) बोथट होण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही, असे स्पष्टिकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिले. भारत बंदच्या दिवशी सोमवारी देशात झालेल्या हिंसाचारात ११ जण ठार झाले. काही ठिकाणी पोलिस व निदर्शकांत चकमकीही झाल्या. त्यासंदर्भात ते निवेदन करीत होते.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) बोथट होण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही, असे स्पष्टिकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिले. भारत बंदच्या दिवशी सोमवारी देशात झालेल्या हिंसाचारात ११ जण ठार झाले. काही ठिकाणी पोलिस व निदर्शकांत चकमकीही झाल्या. त्यासंदर्भात ते निवेदन करीत होते.राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटी कायदा बोथट होण्यासाठी आमच्या सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा या कायद्याचा आढावा घेऊन तो अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. राखीव जागांबाबत अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. पण त्यामध्ये काडीचेही तथ्य नाही. अनुसूचित जाती-जमातींच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या खटल्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत निवेदन करतांना गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, दलितांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक आहे. अनुसूचित जाती जमाती कायदा अधिक मजबूत केला जाईल, हे सरकारचे वचन आहे. मागासवर्गियांच्या आरक्षणाबाबत देशात विनाकारण संभ्रम निर्माण केला जात आहे.कायद्यातील तरतूदींच्या बदलाबाबत सुप्रिम कोर्टाच्या मार्गदर्शक निर्देशांच्या विरोधात देशाच्या दहा राज्यात झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यामुळे मोठफ़ा प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाल्यामुळे संसदेत राजकीय पक्षांमधे अस्वस्थताी होती.दलित व मागसवर्गीयांत अस्वस्थता पसरून, जातीय सलोखा बिघडू नये, याविषयी सर्वांनाच चिंता वाटत होती. त्यामुळे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतल्या हिंसक घटनांचा संदर्भ देत सविस्तर निवेदन केले. केंद्र तसेच विविध राज्य सरकारांनी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली.आजी-माजी आमदारांची घरे दिली पेटवूनजयपूर  - अ‍ॅट्रॉसिटी कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बोथट झाल्याच्या आक्षेप घेत सोमवारी पुकारलेल्या भारत बंदच्या दिवशी राजस्थानातही हिंसक निदर्शने झाली. त्याचा बदला घेण्यासाठी करौलीजवळील हिंडौन येथे निदर्शकांनी मंगळवारी भाजपाचे आमदार राजकुमारी जाटव व काँग्रेसचे माजी आमदार भरौसीलाल जाटव यांची घरे सवर्ण व्यापाऱ्यांनी पेटवली. दलितांचे एक वसतिगृह व एका दलित व्यावसायिकाच्या इमारतीला आग लावली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा