शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

जेएनयू आंदोलनामागे हाफिज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 04:19 IST

जेएनयूतीलअफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला. त्यांच्या या दाव्यानंतर डाव्यांसह विविध राजकीय पक्षांनी त्यांना यासंदर्भात पुरावे देण्याची मागणी केली.जेएनयूतील अफजल गुरूचे उदात्तीकरण करणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात लागलेले भारतविरोधी नारे यामागे सईदचा पाठिंबा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. देशाच्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात जे काही घडले ते दुर्दैवी आहे. मात्र अशावेळी संपूर्ण देशाने एकजूट होऊन सौहार्दाचे दर्शन घडवायला हवे. राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावरून राजकारण करणे थांबवावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या दाव्यानंतर राजकीय गोटात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजनाथ सिंह यांचा दावा अतिशय गंभीर आहे. जेएनयूतील घटनेमागे हाफिज सईद असेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत, असे टिष्ट्वट नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपा नेते डी राजा यांनीही याबाबातचे पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली. राजनाथ यांचा दावा गंभीर आहे. त्यांच्याकडे या दाव्याच्या समर्थनार्थ ठोस पुरावे असावेत, अशी आम्ही आशा करतो. सईदने कथितरीत्या टिष्ट्वट करून पाकिस्तानी नागरिकांना जेएनयूतील घटनेचे समर्थन करण्याचे आवाहन केले गेले आहे. पोलिसांनी तत्काळ या टिष्ट्वटचा तपास सुरू केला. शिवाय यानंतर लगेच दिल्ली पोलिसांच्या पोलीस आयुक्त कार्यालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवरून अलर्ट जारी करीत, जेएनयू व देशातील विद्यार्थी समुदायास सतर्क आणि दक्ष राहण्याचे तसेच कुणाच्याही बहकाव्यात न येण्याचे आवाहन केले होते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी उपरोक्त दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)..................सात विद्यार्थ्यांवर वर्गबंदीविद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्यासह सात विद्यार्थ्यांना सोमवरपासून वर्गांमध्ये बसू न देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने घेतला आहे. दरम्यान कन्हय्या वगळता यापैकी सात विद्यार्थ्यांना चौकशी समितीपुढे हजर राहण्याचेही बजावण्यात आले आहे, असे. जेएनयूचे निबंधक भूपिंन्दर जुटशी यांनी रविवारी सांगितले. कन्हय्या कुमार सध्या पोलिस कोठडीत आहे.—————————विद्यापीठाची अप्रतिष्ठा नकोविद्यापीठात घडलेल्या या एका घडामोडीवरून सरसकट संपूर्ण विद्यापीठास ‘देशद्रोही’ ठरवू नका, असे आवाहन विद्यापीठातील प्राध्यापकांनी केले आहे. समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर संपूर्ण विद्यापीठास बदनाम करणे गैर असल्याचे मत मांडले. विद्यापीठ परिसरात वादग्रस्त कार्यक्रमात भारतविरोधी नारेबाजी झाली असेल नसेल. पण या घटनेनंतर जेएनयू म्हणजे राष्ट्रविरोधी कारवायांचा गढ असल्याचे सांगून विद्यापीठाची प्रतिमा मलीन केली जात आहे. आम्ही अनेक वर्षांपासून येथे शिकवत आहोत. जेएनयू कायम शैक्षणिक आणि लोकशाही संस्कृतीचे प्रतीक राहिले आहे. अशास्थितीत एका घटनेवरून संपूर्ण जेएनयूला राष्ट्रविरोधी म्हणणे गैर आहे, असे ते म्हणाले. भाषाशास्त्राच्या अन्य एका प्राध्यापकांनीही असेच मत व्यक्त केले. विद्यापीठाने संबंधित प्रकरणाची चौकशी आरंभली आहे. पोलीस चौकशी करीत आहेत. दिल्ली सरकारनेही दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण प्रतीक्षा करू शकणार नाही का? विद्यापीठाला अतिरेक्यांचा गढ म्हणण्याची घाई का? असे सवाल त्यांनी केले. विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक करणे गैर असल्याचे मतही या प्राध्यापकांनी मांडले. विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले असेल तर तो शिस्तभंगाचा मुद्दा आहे देशद्रोहाचा नाही, असे ते म्हणाले.................माझा मुलगा तसा नाहीया प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हय्या कुमाराच्या आईने ‘माझ्या पोराला अतिरेकी ठरवू नका’, अश्ी विनंती पाणावलल्या डोळ््यांनी केली.बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हय्याची आई मीनादेवी यांच्या डोळ्यांतून, श्ेजाऱ्यांच्या घरी टीव्ही पाहताना अश्रूधारा वाहू लागल्या. कन्हय्याला अटक केल्याचे मला कळले. मी टीव्हीवर पाहिले. माझ्या मुलाने कधीही वडिलधाऱ्यांचा अपमान केला नाही. देशाचा अपमान तर नाहीच नाही. माझ्या मुलाला अतिरेकी ठरवू नका. तो असे करूच शकत नाही, असे सांगताना मीनादेवींचा कंठ दाटून आला. मीनादेवी अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत. त्या महिन्याला साडेतीन हजार रुपये कमावतात. त्या आणि त्यांचा मोठा मुलगा मणिकांत हे दोघेचे घराच कमावते आहेत. त्यांचे ६५ वर्षीय पती लकवाग्रस्त असून अंथरुणाला खिळलेले आहेत.