शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऐतिहासिक ईडन गार्डन वक्फ बोर्डाची मालमत्ता, ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्र्याचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:08 IST

Eden Garden News: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील क्रिकेटचं  ऐतिहासिक मैदान असलेलं ईडन गार्डन आणि फोर्ट विल्यम इमारत हे वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिमांची मालमत्ता होते, असा दावा सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केला आहे. 

मागच्या काही काळामध्ये वक्फ बोर्ड हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडलेलं असल्याने वक्फचा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे. दरम्यान, या वक्फ बोर्डाकडून विविध मालमत्तांवर दावा सांगितला जात असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तांबाबत असंच एक धक्कादायक विधान केलं आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील क्रिकेटचं  ऐतिहासिक मैदान असलेलं ईडन गार्डन आणि फोर्ट विल्यम इमारत हे वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिमांची मालमत्ता होते, असा दावा सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केला आहे.

सिद्दीकुल्ला चौधरी यांनी सांगितले की, सीएबीने वक्फ बोर्डाच्या या मालमत्तांवर कब्जा केल्यानंतर त्याच्या बदल्यात १५० रुपये भाडं वक्फ बोर्डाला मिळत होतं.  दरम्यान, ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री असलेल्या सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केलेल्या दाव्यानंतर ईडन गार्डन ही खरोखरच वक्फची संपत्ती होती का. तसेच सीएबी त्या मोबदल्यात भाडं द्यायची का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सध्या बंगालमध्ये सीएबी याचा अर्थ क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगाल असा होतो. मात्र ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी ज्या सीएबीबाबत बोलत आहेत. त्याची स्थापना ब्रिटिश काळात झाली होती. तसेच त्याचं नाव कौन्सिल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ बंगाल किंवा कौन्सिल ऑफ अॅडव्हायजरी बोर्ड असं होतं. याचा उल्लेख हा कलकत्ता इंप्रुव्हमेंट अॅक्ट किंवा सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीच्या रूपातही होतो.

ब्रिटिश सरकराने शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रशासन चालवण्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारची मंडळं बनवली होती. सीएबी त्यापैकीच एक होतं. याचा हेतू प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नियंत्रण आणणं हे होतं. दरम्यान, ब्रिटिश काळात वक्फ संपत्तींचं व्यवस्थापन वक्फ अधिनियम, १९२३ अन्वये होत होतं. मुस्लिमांची धार्मिक स्थळं, मकबरे आणि मालमत्तेची देखभाल करणे हा याचा हेतू होता. त्याकाळात सरकारने जर रस्ते-रेल्वे बांधकामांसाठी कुठलीही जमीन घेतली तर त्याचा योग्य मोबदला दिला जायचा. मात्र ईडन गार्डन ही वक्फची संपत्ती आहे का आणि त्याचं भाडं ब्रिटिश वक्फ बोर्डाला द्यायचे का, हे मात्र स्पष्ट होत नाही.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालwaqf board amendment billवक्फ बोर्डAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस