शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐतिहासिक! नागालँडला ११९ वर्षांनी मिळालं दुसरं रेल्वे स्टेशन; थेट अरुणाचल प्रदेश जोडला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 14:56 IST

शुखोवी रेल्वे स्थानकाची भर पडल्याने आता नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट रेल्वे सेवेने जोडले जातील.

शोखुवी: भारत आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ईशान्य भागातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नागालँड राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण, तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटल्यानंतर नागालँडमधील रहिवाशांना दुसरे रेल्वे स्थानक मिळाले आहे. यामुळे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट जोडला जाणार आहे. 

नागालँडमधील नवीन 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वरून 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला रवाना झाली. मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी नव्या 'शोखुवी रेल्वे स्टेशन'वर 'डोनी पोलो एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला. तब्बल ११९ वर्षांहून अधिक काळानंतर नागालँडला दुसरे रेल्वे स्टेशन मिळालं आहे. नागालँडसाठी हा दिवस फार महत्त्वाचा ठरला. नागालँडमधील पहिले रेल्वे स्थानक सुमारे १९०३ मध्ये राजधानी दीमापूर येथे सुरु झाले होते.

नागालँड थेट अरुणाचल प्रदेशला जोडला

डोनी पोलो एक्सप्रेस याआधी आसाममधील गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशातील नाहरलागुन या दरम्यान चालवली जात होती. या एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये वाढ करत टीमापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शोखुवी रेल्वे स्थानकावरही आता ही एक्स्प्रेस थांबणार आहे. डोनी पोलो एक्सप्रेसच्या मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शुखोवी रेल्वे स्थानकाची भर पडल्याने आता नागालँड आणि अरुणाचल प्रदेश थेट रेल्वे सेवेने जोडले जातील.  

दरम्यान, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी नागालँडसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राज्याला १०० वर्षांहून अधिक काळानंतर धनसारी-शोखुवी रेल्वे मार्गावर दुसरे रेल्वे टर्मिनल मिळाले आहे, असे म्हटले आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) महाव्यवस्थापक अंशुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले की, भारतीय रेल्वे आणि NFR साठी हा अभिमानाचा क्षण आहे. NFR ईशान्येकडील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेद्वारे जोडण्याचे काम करत आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagaland-pcनागालँड