शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:45 IST

आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी सिरसामार्गे हंसीला येत होते.

हरियाणातील हिस्सार येथे रविवारी झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाच जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिसार-दिल्ली रोडवरील सेक्टर 27-28 जवळ रविवारी एका कारचं समोरून ट्रक आल्याने नियंत्रण सुटलं आणि ती उलटली. 

या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी तिघे पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील मोड मंडी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी 5 मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तसेच ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी सिरसामार्गे हंसीला येत होते. तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितलं की, कार सेक्टर 27-28 वळणावर येताच समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रकपासून वाचण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटलं.

रणजीत आणि गग्गड सिंग भटिंडाहून सिरसामार्गे हंसीच्या दिशेने त्यांच्या कारने येत होते. सकाळी भटिंडाहून निघाल्यानंतर त्यांनी आधी गग्गड सिंग यांचा मेव्हणा सतपालच्या नातेवाईकाला कालांवलीहून गाडीत बसवलं आणि ते सिरसामार्गे हंसीच्या दिशेने येत होते. त्यांना पंजाबला परत जायचं होतं. 

गग्गड सिंह आणि रणजीत यांचं कुटुंब हे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यासाठी हंसीला येत होते. मात्र हंसीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात झाला. तपास अधिकारी अजायब सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रकची ओळख अद्याप पटली नसून पोलीस चालकाची माहिती गोळा करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात