शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

“ज्या दिवशी भारतीय मुस्लीम अरब देशाकडे तक्रार करतील तेव्हा वादळाचा सामना करावा लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:27 IST

दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये वादग्रस्त पोस्ट केली आहे

नवी दिल्ली – दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ज्या दिवशी मुस्लीम अरब देशांकडे तक्रारी करतील त्या दिवशी वादळाचा सामना करावा लागेल असं धक्कादायक विधान जफरुल इस्लाम खान यांनी केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याने इस्लाम देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप भाजपाने जफरुल इस्लाम यांच्यावर केला आहे.

याबाबत जफरुल इस्लाम खान यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ज्या दिवशी भारतातील मुस्लीम अरब आणि अन्य मुस्लीम देशांकडे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करतील, त्यादिवशी त्सुनामी येईल. धन्यवाद कुवैत, भारतीय मुस्लिमांच्या मदतीसाठी उभे राहिल्याबद्दल, कट्टर हिंदुत्ववादी लोकांना वाटतं की, अरब आणि अन्य मुस्लीम देश आपल्या आर्थिक हिंतसंबंधामुळे भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराची चिंता करणार नाहीत. भारतातील मुस्लिमांची अरब आणि अन्य मुस्लीम देशात प्रचंड लोकप्रियता आहे हे कदाचित हे विसरले असतील. भारतीय मुस्लिमांनी अनेक वर्षापासून सद्भावनेने इस्लामची सेवा केली आहे. इस्लामच्या उल्लेखनीय अभ्यासकांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश आहे, ज्यांनी जागतिक वारसा म्हणून त्यांचे सांस्कृतिक योगदान दिले आहे. शाह वलीउल्लाह देहलवी, इक्बाल, अबुल हसन नदवी, वहीदुद्दीन खान, झाकीर नाईक यांची नावे अरब आणि मुस्लिम देशातील प्रत्येक घरात मोठ्या सन्मानाने घेतली जातात असं त्यांनी सांगितले.

तसेच या कट्टरपंथींनी हे जाणून घ्यावं की, भारतीय मुस्लिमांनी आतापर्यंत द्वेष मोहीम, लिंचिंग आणि दंगलीची कोणतीही तक्रार अरब आणि इतर मुस्लिम जगाताकडे केली नाही. ज्या दिवशी त्यांना असं करण्यास भाग पाडले जाईल त्या दिवशी कट्टरतावाद्यांना वादळाचा सामना करावा लागेल असा इशारा जफरुल इस्लाम यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे. दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये पोस्ट केले आहे

त्यांच्या या पोस्टवर भाजपाचे दिल्लीचे नेते कपिल मिश्रा म्हणाले की, कठोर व विषारी विचार असणाऱ्या जफरुल इस्लाम यांना त्वरित पदावरून दूर करा. झाकीर नाईकला त्यांचे समर्थन आहे.  देशाच्या आत हल्ल्यांविषयी बोलत आहेत. अशा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीचं 'आप'ने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुखपद कायम ठेवले आहे. त्यांना त्वरीत या पदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कुवेतचा हवाला देत भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराचा खोटा दावा करण्यात येत आहे. भारताच्या धार्मिक बदनामीची मोहीम राबविली जात आहे. २७ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते की, दिशाभूल करणार्‍या पोस्ट भारतात पसरल्याचा कुवेत सरकारशी काही संबंध नाही. कुवेत सरकारने आश्वासन दिले आहे की त्यांना भारताशी जवळची मैत्री हवी आहे. भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्यावर कुवेत कुणाच्या सोबत नाही असं स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Muslimमुस्लीम