शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

“ज्या दिवशी भारतीय मुस्लीम अरब देशाकडे तक्रार करतील तेव्हा वादळाचा सामना करावा लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:27 IST

दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये वादग्रस्त पोस्ट केली आहे

नवी दिल्ली – दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ज्या दिवशी मुस्लीम अरब देशांकडे तक्रारी करतील त्या दिवशी वादळाचा सामना करावा लागेल असं धक्कादायक विधान जफरुल इस्लाम खान यांनी केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याने इस्लाम देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप भाजपाने जफरुल इस्लाम यांच्यावर केला आहे.

याबाबत जफरुल इस्लाम खान यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ज्या दिवशी भारतातील मुस्लीम अरब आणि अन्य मुस्लीम देशांकडे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करतील, त्यादिवशी त्सुनामी येईल. धन्यवाद कुवैत, भारतीय मुस्लिमांच्या मदतीसाठी उभे राहिल्याबद्दल, कट्टर हिंदुत्ववादी लोकांना वाटतं की, अरब आणि अन्य मुस्लीम देश आपल्या आर्थिक हिंतसंबंधामुळे भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराची चिंता करणार नाहीत. भारतातील मुस्लिमांची अरब आणि अन्य मुस्लीम देशात प्रचंड लोकप्रियता आहे हे कदाचित हे विसरले असतील. भारतीय मुस्लिमांनी अनेक वर्षापासून सद्भावनेने इस्लामची सेवा केली आहे. इस्लामच्या उल्लेखनीय अभ्यासकांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश आहे, ज्यांनी जागतिक वारसा म्हणून त्यांचे सांस्कृतिक योगदान दिले आहे. शाह वलीउल्लाह देहलवी, इक्बाल, अबुल हसन नदवी, वहीदुद्दीन खान, झाकीर नाईक यांची नावे अरब आणि मुस्लिम देशातील प्रत्येक घरात मोठ्या सन्मानाने घेतली जातात असं त्यांनी सांगितले.

तसेच या कट्टरपंथींनी हे जाणून घ्यावं की, भारतीय मुस्लिमांनी आतापर्यंत द्वेष मोहीम, लिंचिंग आणि दंगलीची कोणतीही तक्रार अरब आणि इतर मुस्लिम जगाताकडे केली नाही. ज्या दिवशी त्यांना असं करण्यास भाग पाडले जाईल त्या दिवशी कट्टरतावाद्यांना वादळाचा सामना करावा लागेल असा इशारा जफरुल इस्लाम यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे. दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये पोस्ट केले आहे

त्यांच्या या पोस्टवर भाजपाचे दिल्लीचे नेते कपिल मिश्रा म्हणाले की, कठोर व विषारी विचार असणाऱ्या जफरुल इस्लाम यांना त्वरित पदावरून दूर करा. झाकीर नाईकला त्यांचे समर्थन आहे.  देशाच्या आत हल्ल्यांविषयी बोलत आहेत. अशा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीचं 'आप'ने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुखपद कायम ठेवले आहे. त्यांना त्वरीत या पदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कुवेतचा हवाला देत भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराचा खोटा दावा करण्यात येत आहे. भारताच्या धार्मिक बदनामीची मोहीम राबविली जात आहे. २७ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते की, दिशाभूल करणार्‍या पोस्ट भारतात पसरल्याचा कुवेत सरकारशी काही संबंध नाही. कुवेत सरकारने आश्वासन दिले आहे की त्यांना भारताशी जवळची मैत्री हवी आहे. भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्यावर कुवेत कुणाच्या सोबत नाही असं स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Muslimमुस्लीम