शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंदू कुटुंबाने कमीत कमी ३ मुलं जन्माला घाला; भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 10:16 IST

एकीकडे देशभरात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करावा अशी मागणी होत आहे

लखनऊ - अनेकदा देशात भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या विधानांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याचं लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नेत्यांना तंबी दिली होती. पंतप्रधानांच्या तंबीनंतरही भाजपा नेत्यांची बेताल विधान सुरुच असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातील मंत्री सुनील भराला यांनी हिंदू कुटुंबाने तीन मुले जन्माला घाला असा सल्ला दिला आहे. 

याबाबत सुनील भराला यांनी सांगितले की, आज समाजात फक्त दोन मुलांना जन्म द्यावा अशी मागणी केली जाते. मात्र असा कोणताही कायदा नाही, बहुतांश हिंदू कुटुंब एकास मुलाला जन्म देतात. मला वैयक्तिक वाटतं की, हम पॉंच याचा विचार हिंदू कुटुंबांनी करायला हवा. प्रत्येक कुटुंबात तीन मुले आणि त्यात एक मुलगी असायला हवी असं त्यांनी सांगितले. 

एकीकडे देशभरात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करावा अशी मागणी होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा कायद्याची गरज आहे असं सांगितले आहे. मात्र सुनील भराला यांच्या विधानामुळे भाजपाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. इदरीशपूर गावातील एका समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

तसेच हैदराबाद येथे जे घडले ते दुर्दैवी आहे. पोलिसांनी चांगले काम केले, उन्नाव घटनेबाबतही उत्तर प्रदेश सरकार गंभीर आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही असा इशाराही मंत्री सुनील भराला यांनी दिला आहे.  

टॅग्स :BJPभाजपा