शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 15:37 IST

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एचएएम (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम हे काल्पनिक व्यक्तीमत्व असल्याचं यापूर्वी मांझी यांनी म्हटलं होत. आता, पुन्हा एकदा मांझींनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केलं असून ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द वापरले आहेत. हिंदू धर्म खराब असल्याचे सांगत सत्यनारायणाच्या पूजेवरही त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

मांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, ट्विटरवरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाटणा येथील मुसर भुइया समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये, आता प्रत्येक ठिकाणी आमच्या इथे टोलामध्येही सत्यनारायणाची पूजा घालण्यात येते. त्यासाठी, ब्राह्मण येतात आणि म्हणतात आम्ही जेवण करणार नाहीत, तुम्ही रोख रक्कम द्या. पूर्वी गरिबांच्याघरी ही पूजा होत नसत. मात्र, आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे, असे मांझी यांनी म्हटले. 

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. मांझी यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, मांझी यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलंय. माझ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ब्राह्मणांसदर्भात केवळ तितकंच सांगण्यात आलंय, ज्यातून वाद निर्माण होईल. त्यामुळे, माझा संपू्र्ण व्हिडिओ पाहावा, असे मांझी यांनी म्हटलंय. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल माझ्या मनात माझ्या कुटुंबाप्रमाणे इज्जत, आदर आहे. मी ब्राह्मण समाजाला नाही, तर आमच्याच समाजाला शिवी दिली होती, अशी सारवासारव त्यांनी केली. 

यापूर्वीही श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान

रामायण रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांना देशाने श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं

टॅग्स :BiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीHinduहिंदू