शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 15:37 IST

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एचएएम (हिंदुस्तानी आवाम मोर्चा) पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रभू श्रीराम हे काल्पनिक व्यक्तीमत्व असल्याचं यापूर्वी मांझी यांनी म्हटलं होत. आता, पुन्हा एकदा मांझींनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केलं असून ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द वापरले आहेत. हिंदू धर्म खराब असल्याचे सांगत सत्यनारायणाच्या पूजेवरही त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

मांझी यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्म आणि सत्यनारायण पूजासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, ट्विटरवरुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाटणा येथील मुसर भुइया समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये, आता प्रत्येक ठिकाणी आमच्या इथे टोलामध्येही सत्यनारायणाची पूजा घालण्यात येते. त्यासाठी, ब्राह्मण येतात आणि म्हणतात आम्ही जेवण करणार नाहीत, तुम्ही रोख रक्कम द्या. पूर्वी गरिबांच्याघरी ही पूजा होत नसत. मात्र, आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे, असे मांझी यांनी म्हटले. 

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. मांझी यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, मांझी यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलंय. माझ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ब्राह्मणांसदर्भात केवळ तितकंच सांगण्यात आलंय, ज्यातून वाद निर्माण होईल. त्यामुळे, माझा संपू्र्ण व्हिडिओ पाहावा, असे मांझी यांनी म्हटलंय. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल माझ्या मनात माझ्या कुटुंबाप्रमाणे इज्जत, आदर आहे. मी ब्राह्मण समाजाला नाही, तर आमच्याच समाजाला शिवी दिली होती, अशी सारवासारव त्यांनी केली. 

यापूर्वीही श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान

रामायण रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांना देशाने श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवान राम हे एक काल्पनिक पात्र होते, असे ते म्हणालेले. संतहे रामापेक्षा हजारो पटींनी मोठे होते. हा माझा व्यक्तीगत विचार होता, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीय, असही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं

टॅग्स :BiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीHinduहिंदू