शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"जर हिंदूंची संख्या कमी झाली तर...", विहिंपकडून चिंता, तरुणांनी कधी लग्न करावं सांगितलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:57 IST

VHP on Hindu Population : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

VHP on Hindu Population : भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत घसरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

यामध्ये हिंदूंची घटती लोकसंख्या, कुटुंबांचे विघटन, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाची वाढती प्रवृत्ती, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या समस्या हिंदू समाजासाठी एक मोठे आव्हान बनल्या असून याचे उत्तर तरुण पिढीला द्यावे लागणार आहे, असे सांगण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू युवा शक्तीने नेहमीच देशासमोरील प्रत्येक समस्या आणि आव्हानांना प्रतिसाद दिला आहे. हिंदू समाजाच्या लोकसंख्येचे संतुलन सतत बिघडत आहे, हे समाजासाठी घातक ठरू शकते. हिंदू ही भारताची ओळख आहे आणि जर हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर देशावर संकटाचे ढग येतील. तसेच, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी हिंदू तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.

पुढे सुरेंद्र जैन म्हणाले की, लग्नाला होणारा विलंब आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या भ्रामक संकल्पनांमुळे हिंदू जोडप्यांमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे हिंदू तरुणांनी वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करावे, ही आजची गरज आहे. तसेच, पाश्चात्य भौतिकवाद, शहरी नक्षलवादी कट आणि जागतिक कॉर्पोरेट एंटरटेनमेंटच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाई गोंधळून जात आहे. ज्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप वाढत आहेत.

दरम्यान, या ठरावाद्वारे विश्व हिंदू परिषदेने आनंदी कौटुंबीक जीवन सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मुलांना आणि वृद्धांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या संस्कृतीकडे परतण्याचे तरुणांना आवाहन केले. दुसरीकडे, सुरेंद्र जैन यांनीही देशातील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. देशभरातील १६ कोटींहून अधिक लोकांचे अंमली पदार्थांचे व्यसन हे अशा समस्यांचे मूळ कारण असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूPrayagrajप्रयागराज