शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"जर हिंदूंची संख्या कमी झाली तर...", विहिंपकडून चिंता, तरुणांनी कधी लग्न करावं सांगितलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:57 IST

VHP on Hindu Population : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

VHP on Hindu Population : भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत घसरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

यामध्ये हिंदूंची घटती लोकसंख्या, कुटुंबांचे विघटन, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाची वाढती प्रवृत्ती, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या समस्या हिंदू समाजासाठी एक मोठे आव्हान बनल्या असून याचे उत्तर तरुण पिढीला द्यावे लागणार आहे, असे सांगण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू युवा शक्तीने नेहमीच देशासमोरील प्रत्येक समस्या आणि आव्हानांना प्रतिसाद दिला आहे. हिंदू समाजाच्या लोकसंख्येचे संतुलन सतत बिघडत आहे, हे समाजासाठी घातक ठरू शकते. हिंदू ही भारताची ओळख आहे आणि जर हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर देशावर संकटाचे ढग येतील. तसेच, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी हिंदू तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.

पुढे सुरेंद्र जैन म्हणाले की, लग्नाला होणारा विलंब आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या भ्रामक संकल्पनांमुळे हिंदू जोडप्यांमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे हिंदू तरुणांनी वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करावे, ही आजची गरज आहे. तसेच, पाश्चात्य भौतिकवाद, शहरी नक्षलवादी कट आणि जागतिक कॉर्पोरेट एंटरटेनमेंटच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाई गोंधळून जात आहे. ज्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप वाढत आहेत.

दरम्यान, या ठरावाद्वारे विश्व हिंदू परिषदेने आनंदी कौटुंबीक जीवन सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मुलांना आणि वृद्धांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या संस्कृतीकडे परतण्याचे तरुणांना आवाहन केले. दुसरीकडे, सुरेंद्र जैन यांनीही देशातील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. देशभरातील १६ कोटींहून अधिक लोकांचे अंमली पदार्थांचे व्यसन हे अशा समस्यांचे मूळ कारण असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूPrayagrajप्रयागराज