शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

"जर हिंदूंची संख्या कमी झाली तर...", विहिंपकडून चिंता, तरुणांनी कधी लग्न करावं सांगितलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:57 IST

VHP on Hindu Population : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

VHP on Hindu Population : भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत घसरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शुक्रवारी (दि.७) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय उमेदवार मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात, एक ठराव मंजूर करण्यात आला. 

यामध्ये हिंदूंची घटती लोकसंख्या, कुटुंबांचे विघटन, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाची वाढती प्रवृत्ती, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या समस्या हिंदू समाजासाठी एक मोठे आव्हान बनल्या असून याचे उत्तर तरुण पिढीला द्यावे लागणार आहे, असे सांगण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू युवा शक्तीने नेहमीच देशासमोरील प्रत्येक समस्या आणि आव्हानांना प्रतिसाद दिला आहे. हिंदू समाजाच्या लोकसंख्येचे संतुलन सतत बिघडत आहे, हे समाजासाठी घातक ठरू शकते. हिंदू ही भारताची ओळख आहे आणि जर हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर देशावर संकटाचे ढग येतील. तसेच, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी हिंदू तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.

पुढे सुरेंद्र जैन म्हणाले की, लग्नाला होणारा विलंब आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या भ्रामक संकल्पनांमुळे हिंदू जोडप्यांमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे हिंदू तरुणांनी वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करावे, ही आजची गरज आहे. तसेच, पाश्चात्य भौतिकवाद, शहरी नक्षलवादी कट आणि जागतिक कॉर्पोरेट एंटरटेनमेंटच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाई गोंधळून जात आहे. ज्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप वाढत आहेत.

दरम्यान, या ठरावाद्वारे विश्व हिंदू परिषदेने आनंदी कौटुंबीक जीवन सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मुलांना आणि वृद्धांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्या संस्कृतीकडे परतण्याचे तरुणांना आवाहन केले. दुसरीकडे, सुरेंद्र जैन यांनीही देशातील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. देशभरातील १६ कोटींहून अधिक लोकांचे अंमली पदार्थांचे व्यसन हे अशा समस्यांचे मूळ कारण असल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूPrayagrajप्रयागराज