शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:03 IST

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

Tirupati Laddu Prasadam Controversy : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापलं आहे. या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शुक्रवारी (२० सप्टेंबर) मोठी मागणी केली आहे. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर असहनीय असल्याचे विहिंपने म्हटले आहे. आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागरा यांनीही देशभरातील हिंदूंची सर्व मंदिरे आणि अन्य देवस्थान सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली. तसेच, तिरुपती मंदिराच्या प्रसादला अपवित्र करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. "तिरुपतीच्या घटनेने विश्व हिंदू परिषदेचा विश्वास अधिक दृढ होतो की, मंदिरांवर सरकारी नियंत्रणामुळे राजकीय प्रवेश होतो. तेथे (सरकारी-नियंत्रित मंदिरांमध्ये) गैर-हिंदू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रसाद मुद्दाम अशाप्रकारे अपवित्र केला जातो", असा आरोप बजरंग बागरा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाखाली राहू नयेत, अशी विहिंपची अनेक दिवसांपासून मागणी आहे. तिरुपती लाडू प्रसादामधील प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर हे असहनीय आणि घृणास्पद कृत्य आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज व्यथित आणि दुखावला आहे. हिंदू समाज आपल्या श्रद्धेवर असे वारंवार होणारे हल्ले सहन करणार नाही, असे बजरंग बागरा म्हणाले. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे. तिरुपती लाडू प्रकारणाचा निःपक्षपातीपणे तपास करून त्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. 

विनोद बन्सल यांनीही केलं मोठं विधान विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही तिरुपती मंदिर आणि देशभरातील इतर सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "फक्त तिरुपती मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही. तर देशभरातील राज्यांमध्ये चार लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि त्यांची मालमत्ता हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावी. मंदिरांचे खरे विश्वस्त हिंदू आहेत, सरकार नाही. हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रणाविरोधात विहिंप लवकरच मोठी मोहीम सुरू करणार आहे."

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटHinduहिंदूTempleमंदिर