शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:03 IST

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

Tirupati Laddu Prasadam Controversy : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापलं आहे. या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शुक्रवारी (२० सप्टेंबर) मोठी मागणी केली आहे. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर असहनीय असल्याचे विहिंपने म्हटले आहे. आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागरा यांनीही देशभरातील हिंदूंची सर्व मंदिरे आणि अन्य देवस्थान सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली. तसेच, तिरुपती मंदिराच्या प्रसादला अपवित्र करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. "तिरुपतीच्या घटनेने विश्व हिंदू परिषदेचा विश्वास अधिक दृढ होतो की, मंदिरांवर सरकारी नियंत्रणामुळे राजकीय प्रवेश होतो. तेथे (सरकारी-नियंत्रित मंदिरांमध्ये) गैर-हिंदू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रसाद मुद्दाम अशाप्रकारे अपवित्र केला जातो", असा आरोप बजरंग बागरा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाखाली राहू नयेत, अशी विहिंपची अनेक दिवसांपासून मागणी आहे. तिरुपती लाडू प्रसादामधील प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर हे असहनीय आणि घृणास्पद कृत्य आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज व्यथित आणि दुखावला आहे. हिंदू समाज आपल्या श्रद्धेवर असे वारंवार होणारे हल्ले सहन करणार नाही, असे बजरंग बागरा म्हणाले. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे. तिरुपती लाडू प्रकारणाचा निःपक्षपातीपणे तपास करून त्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. 

विनोद बन्सल यांनीही केलं मोठं विधान विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही तिरुपती मंदिर आणि देशभरातील इतर सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "फक्त तिरुपती मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही. तर देशभरातील राज्यांमध्ये चार लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि त्यांची मालमत्ता हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावी. मंदिरांचे खरे विश्वस्त हिंदू आहेत, सरकार नाही. हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रणाविरोधात विहिंप लवकरच मोठी मोहीम सुरू करणार आहे."

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटHinduहिंदूTempleमंदिर