शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:11 IST

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ‘आता संयम संपत चालला आहे. गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ अशी निर्वाणीची भाषा रा. स्व. संघाने केल्यानंतर आता हिंदू संतांनी सरकारला वेठीस धरले आहे.गेले दोन दिवस येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, असा एकूण सूर होता.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी तर आवाहन न करता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा, असा आदेशच देऊन टाकला. सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन संतांनी केले.अधिवेशनात भाषण करताना जगद््गुरु रामभद्राचार्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी (पान २ वर)मशिदीच्या आग्रहाने हिंदूंना असहिष्णू करू नकामुस्लिमांच्या मदिना शहरात एकही मंदिर नाही. ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन सिटीमध्येही एकही मंदिर नाही. मग अयोध्येतील राम मंदिराशेजारी मशिद उभारण्याचा आग्रह कशासाठी? हिंदू हे जगातील सर्वातसहिष्णू आहेत.रामजन्मभूमीवर मशिदीच्या आग्रहाने त्यांना असहिष्णू व्हायला भाग पाडू नका, असे इशारावजा आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. त्या म्हणाल्या की, अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.त्यामुळे आता तेथे मंदिरबांधणे हा श्रद्धेचा विषय नसून फक्त जमिनीचा वाद आहे. तो न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करून त्यांच्या पक्षाने पूर्वी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या