शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:11 IST

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ‘आता संयम संपत चालला आहे. गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ अशी निर्वाणीची भाषा रा. स्व. संघाने केल्यानंतर आता हिंदू संतांनी सरकारला वेठीस धरले आहे.गेले दोन दिवस येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, असा एकूण सूर होता.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी तर आवाहन न करता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा, असा आदेशच देऊन टाकला. सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन संतांनी केले.अधिवेशनात भाषण करताना जगद््गुरु रामभद्राचार्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी (पान २ वर)मशिदीच्या आग्रहाने हिंदूंना असहिष्णू करू नकामुस्लिमांच्या मदिना शहरात एकही मंदिर नाही. ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन सिटीमध्येही एकही मंदिर नाही. मग अयोध्येतील राम मंदिराशेजारी मशिद उभारण्याचा आग्रह कशासाठी? हिंदू हे जगातील सर्वातसहिष्णू आहेत.रामजन्मभूमीवर मशिदीच्या आग्रहाने त्यांना असहिष्णू व्हायला भाग पाडू नका, असे इशारावजा आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. त्या म्हणाल्या की, अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.त्यामुळे आता तेथे मंदिरबांधणे हा श्रद्धेचा विषय नसून फक्त जमिनीचा वाद आहे. तो न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करून त्यांच्या पक्षाने पूर्वी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या