शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:17 IST

राम नवमीनिमित्ताने आयोजित हवन-पूजन कार्यक्रमावरून जेएनयूमध्ये तणावर निर्माण झाला होता.

नवी दिल्ली: अनेकविध कारणांमुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायम चर्चेत असते. अलीकडेच जेएनयू विद्यापाठीत डावा गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिंदू महासभेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने नाव बदलण्याची मागणी केली आहे. या विद्यापीठाचे नाव वीर सावरकर करावे, या मागणीचे पत्र हिंदू महासभेने मोदी सरकारला लिहिले आहे. 

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले आहे. राम नवमीच्या दिवशी कावेरी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या हवन-पूजनामध्ये लेफ्ट विंगच्या विद्यार्थ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही फुटीरतावादी आणि तुकडे टुकडे गँग देशद्रोही घटकांशी संगनमत करून पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशाच्या विरोधात घोषणाबाजी करतात आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा करतातस असे निदर्शनास येते. हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जातो, तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते वीर सावरकरांचा अपमान केला जातो. यामुळे जवाहरलाल विद्यापीठाचे नाव बदलून वीर सावरकर विद्यापीठ करावे. तसेच बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, एबीवीपीचे विद्यार्थी द्वेषाचे राजकारण करत कावेरी हॉस्टेलमधील वातावरण बिघडवले जात आहे. यासाठी ते हिंसाचार करत आहेत. तसेच एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी मेस कमिटीला जेवणात बदल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनेने केला आहे.  

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूCentral Governmentकेंद्र सरकार