शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:17 IST

राम नवमीनिमित्ताने आयोजित हवन-पूजन कार्यक्रमावरून जेएनयूमध्ये तणावर निर्माण झाला होता.

नवी दिल्ली: अनेकविध कारणांमुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायम चर्चेत असते. अलीकडेच जेएनयू विद्यापाठीत डावा गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिंदू महासभेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने नाव बदलण्याची मागणी केली आहे. या विद्यापीठाचे नाव वीर सावरकर करावे, या मागणीचे पत्र हिंदू महासभेने मोदी सरकारला लिहिले आहे. 

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले आहे. राम नवमीच्या दिवशी कावेरी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या हवन-पूजनामध्ये लेफ्ट विंगच्या विद्यार्थ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा

केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही फुटीरतावादी आणि तुकडे टुकडे गँग देशद्रोही घटकांशी संगनमत करून पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशाच्या विरोधात घोषणाबाजी करतात आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा करतातस असे निदर्शनास येते. हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जातो, तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते वीर सावरकरांचा अपमान केला जातो. यामुळे जवाहरलाल विद्यापीठाचे नाव बदलून वीर सावरकर विद्यापीठ करावे. तसेच बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, एबीवीपीचे विद्यार्थी द्वेषाचे राजकारण करत कावेरी हॉस्टेलमधील वातावरण बिघडवले जात आहे. यासाठी ते हिंसाचार करत आहेत. तसेच एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी मेस कमिटीला जेवणात बदल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनेने केला आहे.  

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूCentral Governmentकेंद्र सरकार