शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

Himanta Biswa Sarma: 'जसं कलम ३७० रद्द झालं, तसंच निजाम आणि ओवेसी देखील नष्ट होतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:08 IST

Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे.

Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे. देशातून निजाम आणि ओवेसींचं नाव देखील नष्ट होईल तो दिवस आता दूर नाही, असं हेमंत बिस्वा सरमा म्हणाले आहेत. तेलंगणातील वारंगल येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

"ज्यापद्धतीनं कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. तसंच इथंही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं नष्ट केलं जाईल आणि तो दिवस आता दूर नाही", असं विधान हेमंत बिस्वा सरमा यांनी केलं आहे. वारंगलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भारतात आता खोटारड्या धरनिरपेक्ष व धार्मिक राजकारण करणाऱ्यांना कधीच खपवून घेणार नाही, असंही ते म्हणाले. 

"बाबर, औरंगजेब आणि निजाम जास्तवेळ टिकू शकले नाहीत हा भारताचा इतिहास आहे. निजामांचं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल आणि भारतीय सभ्यतावर आधारित नवी संस्कृती जन्माला येईल असं मला वाटतं", असं हेमंत बिस्वा म्हणाले. 

हेमंत बिस्वा यांनी यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. काहीही झालं तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. "जेव्हा एखादा हुकूमशहा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनतो तेव्हा देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. थोडं कष्ट सहन करावे लागतील. तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. आपल्या लढाईमुळेच नवं तेलंगणा उभं राहिलं आहे. इंदिरा गांधींसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीला देखील समुद्रात फेकून दिलं गेलं होतं. भारतात हुकूमशाहीला थारा नाही", असं हेमंत बिस्वा म्हणाले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपा