शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Himanta Biswa Sarma: 'जसं कलम ३७० रद्द झालं, तसंच निजाम आणि ओवेसी देखील नष्ट होतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:08 IST

Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे.

Himanta Biswa Sarma In Telangana: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी तेलंगणात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं आहे. देशातून निजाम आणि ओवेसींचं नाव देखील नष्ट होईल तो दिवस आता दूर नाही, असं हेमंत बिस्वा सरमा म्हणाले आहेत. तेलंगणातील वारंगल येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

"ज्यापद्धतीनं कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. तसंच इथंही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं नष्ट केलं जाईल आणि तो दिवस आता दूर नाही", असं विधान हेमंत बिस्वा सरमा यांनी केलं आहे. वारंगलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भारतात आता खोटारड्या धरनिरपेक्ष व धार्मिक राजकारण करणाऱ्यांना कधीच खपवून घेणार नाही, असंही ते म्हणाले. 

"बाबर, औरंगजेब आणि निजाम जास्तवेळ टिकू शकले नाहीत हा भारताचा इतिहास आहे. निजामांचं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल आणि भारतीय सभ्यतावर आधारित नवी संस्कृती जन्माला येईल असं मला वाटतं", असं हेमंत बिस्वा म्हणाले. 

हेमंत बिस्वा यांनी यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. काहीही झालं तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. "जेव्हा एखादा हुकूमशहा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनतो तेव्हा देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. थोडं कष्ट सहन करावे लागतील. तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. आपल्या लढाईमुळेच नवं तेलंगणा उभं राहिलं आहे. इंदिरा गांधींसारख्या हुकुमशाही प्रवृत्तीला देखील समुद्रात फेकून दिलं गेलं होतं. भारतात हुकूमशाहीला थारा नाही", असं हेमंत बिस्वा म्हणाले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपा