शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:33 IST

Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. तसेच ४० जण अजूनही बेपत्ता आहेत. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत तब्बल ४०७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

भूस्खलनामुळे २६१ रस्ते बंद आहेत, ५९९ ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत आणि ७९४ पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. २४७ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे, १४ घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ५७ घरांचं मोठं नुकसान झालं आहे, तर १७९ गोशाळा वाहून गेल्या आहेत.

हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि हमीरपूर जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा जारी केला आहे. विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट आणि ५ ते ९ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल रात्री सिरमौर, हमीरपूर आणि शिमलासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

मंडी जिल्ह्यातील सिराज भागात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासनाच्या पथके मदत कार्यात गुंतलेली आहेत. हवामान खात्याने लोकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूरRainपाऊस