शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:33 IST

Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. तसेच ४० जण अजूनही बेपत्ता आहेत. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत तब्बल ४०७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

भूस्खलनामुळे २६१ रस्ते बंद आहेत, ५९९ ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत आणि ७९४ पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. २४७ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे, १४ घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि ५७ घरांचं मोठं नुकसान झालं आहे, तर १७९ गोशाळा वाहून गेल्या आहेत.

हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि हमीरपूर जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा जारी केला आहे. विभागाने आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट आणि ५ ते ९ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल रात्री सिरमौर, हमीरपूर आणि शिमलासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

मंडी जिल्ह्यातील सिराज भागात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासनाच्या पथके मदत कार्यात गुंतलेली आहेत. हवामान खात्याने लोकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूरRainपाऊस