शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अयोध्येत हायअलर्ट; दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 09:22 IST

अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे.

अयोध्या - 2005 मध्ये अयोध्येत दहशतवादी हल्ला होता या हल्ल्यातील आरोपींना 18 जून रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. मात्र या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत घातपात होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे अयोध्येत हायअलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा जागता पहारा असणार आहे. 

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमार्गे काही दहशतवादी भारतात घुसले असून अयोध्येला ते निशाणा बनविण्याची शक्यता आहे. अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे. 5 जून 2005 रोजी अयोध्येत हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. तसेच या हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्या 4 दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. याच दहशतवाद्यांवर 18 जून रोजी सुनावणी होणार आहे.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता ते अयोध्येत दाखल होतील त्यानंतर 10 वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील अशी माहिती अयोध्या दौऱ्याचे संयोजक खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जागोजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिग्ज आणि फलक लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे. 

टॅग्स :High Alertहाय अलर्टAyodhyaअयोध्याTerror Attackदहशतवादी हल्ला