शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

बंगळुरूत 127 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:04 IST

 बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  

ठळक मुद्दे बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  बंगळुरू शहरात सोमवारी रात्री 44.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मंगळवारी सकाळी ही पावसाची नोंद वाढलेली पाहायला मिळाली.मंगळवारी सकाळी बंगळुरू शहरात 128.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगळुरू, दि. 16-  बंगळुरूला सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.  बंगळुरू शहरात सोमवारी रात्री 44.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर मंगळवारी सकाळी ही पावसाची नोंद वाढलेली पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी बंगळुरू शहरात 128.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1890 नंतर 2017 च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी रात्री अकरा ते बुधवारी सकाळी 4 वाजेपर्यंत पावसाने हा उच्चांक गाठला आहे. एकंदरीतच बंगळुरूमध्ये 127 वर्षांनंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

याआधी 27 ऑगस्ट 1890मध्ये बंगळुरूत सर्वात जास्त पाऊस पडला होता. त्यावेळी 162.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार 1890नंतर आता 2017मध्ये इतक्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटक राज्य आपत्ती देखरेख कक्षाच्या माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून 184 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

आणखी वाचा

राज्यात 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

महापुरामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू 

सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा शहराच्या विविध भागांमध्ये तडाखा बसला. शहरामधील सखल भागात ठिकठिकाणी पाणी जमल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी रात्री सुरू झालेला हा पाऊस मंगळवारी सकाळीसुद्धा तितकाच बरसत होता. त्यामुळे शहरातील जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला. शहरात असणाऱ्या यदियार तलावातून संरक्षण भिंत ओलांडून पाणी वाहत होतं. तर बेलंदूर तलावातील पाणी आसपासच्या परिसरात शिरलं होतं. कोरामंगल भागातील सखल भागात पाणी साचल्याने तेथे  बचावासाठी 40 बचाव बोटी उतरल्या होत्या. तसंच जयानगर, कोरामंगल आणि बॅनरघट्टा रोडवर तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अग्मिशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. तसंच राजराजेश्वरी नगर, जेपी नगर, नगरभवी, थानिसंद्रा, उत्तराहल्ली आणि पुत्तनाहल्ली या भागात असलेल्या घरांमध्ये साप शिरल्याच्या तक्रारी करणारे फोन वन्यजीवन स्वयंसेवकांना करण्यात आले होते. 

मंगळवारी स्वातंत्र्य दिन असल्याने शाळा आणि ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे बंगळुरूमधील लोकांना घराबाहेर पडावं न लागल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण सोमवारी रात्रपाळीसाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी घरी परतत असताना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला.