शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

थेट मोदींनाच केला फोन, केदारनाथच्या मुख्य पुजाऱ्यास रस्त्याने परत जाण्याची अनुमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:03 IST

थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का

डेहराडून : ‘लॉकडाऊन’मुळे नांदेड जिल्ह्यात अटकून पडलेले चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर लिंग व मंदिर प्रशासनाच्या आणखी चार कर्मचाऱ्यांना रस्त्याने केदारनाथला परत येण्याची परवानगी मिळाली आहे. परत जाण्याची काही तरी विशेष व्यवस्था करावी अशी विनंती करणारे पत्र लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्याला रस्ता मार्गाने परत जाण्याची परवानगी दिली आहे व त्यामुळे आपण २९ एप्रिलपूर्वी पुन्हा केदारनाथला पोहोचू शकू, असे लिंग यांनी टेलिफोनवरून सांगितले.

थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का, यावरही उत्तराखंड सरकारने विचार केला. ते शक्य न झाल्यावर मंदिर पुन्हा उघडण्याचा समारंभ आॅनलाईन करावा, असेही राज्य सरकारने सुचविले. परंतु त्यास सर्व पुजाºयांनी विरोध केल्यावर अखेर ही परवानगी देण्यात आल्याचे समजते.आदि शंकराचार्यांच्या वेळेपासून रुढ झालेल्या परंपरेनुसार देवाच्या मंदिरातील पुनरागमनाच्या मिरवणुकीचे यजमानपद मुख्य पुजाºयांकडे असते व मूर्तीला मुकुटही त्यांनीच विधीपूर्वक चढवायचा असतो. भीमाशंकर लिंग यांनी मोदींना पत्र लिहून ही अडचण विषद करून मंदिर पुन्हा उघण्यापूर्वी आपण केदारनाथला पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे लिंग यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. रस्तामार्गे जाण्याची परवानगी दिल्यास आपली जाण्याची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Kedareshwar Mandirकेदारेश्वर मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी