शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

हायकोर्टाचा सवाल ! सरकारच्या 'या' योजनेचा लाभ केवळ 'बीपीएल'धारकांनाच का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 09:23 IST

सरकारच्या या योजनेचा लाभ सर्वच स्तरातील गरिब कुटुंबीयांना व्हायला हवा, तसे का होत नाही ? असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.

नवी दिल्ली - अनुवांशिक आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार देण्याची सरकारची योजना आहे. मात्र, या योजनेवरुन दिल्ली हायकोर्टाने सरकारला विचारणा केली आहे. गंभीर आजारांवर मोफत उपचार केवळ बीपीएलधारक म्हणजेच दारिद्र्य रेषेखाखालील कुटुंबीयांनाच का ? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे. याप्रकरणी केंद्र आणि दिल्ली सरकारला हायकोर्टाने उत्तरही मागितले आहे. 

सरकारच्या या योजनेचा लाभ सर्वच स्तरातील गरिब कुटुंबीयांना व्हायला हवा, तसे का होत नाही ? असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने सरकारला विचारला आहे. गतवर्षी हायकोर्टाच्या आदेशानंतर, सरकारने 26 मे रोजी अनुवांशिक आणि गंभीर आजारांवरील उपचार मोफत देण्याची योजना सुरू केली होती. विशेष म्हणजे, हायकोर्टात दोन मुलींच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी सरकारकडून दारिद्र्य रेषेवरील कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचे हायकोर्टाने म्हटले. जस्टीस विभू भाकरू यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर, भाकरू यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दिल्ली सरकारला याबाबत नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये सरकारकडून बीपीएल आणि एपीएल कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत कृत्रिम अंतर असून ते घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

एका याचिकाकर्ता साडेचार वर्षांची मुलगी असून ती एमपीएस या रोगाने पीडित आहे. तर दुसरी याचिकाकर्ती 10 वर्षीय मुलगी असून ती एसएमए (तंत्रिका तंत्र संबंध) या रोगाने पीडित आहे. या दोघांनीही कोर्टात याचिकेद्वारे दावा केला असून या रोगांवरील उपचार अतिशय महाग आहेत. त्यामुळे आमचे आई-वडिल या रोगाचा खर्च उचलण्यास असमर्थ असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर, कोर्टाने सरकारला याबाबत उत्तम देण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटल