शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

तयारीला लागा, हिमालयात कधीही येऊ शकतो विनाशकारी भूकंप; वैज्ञानिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 10:41 IST

पाहा काय म्हटलंय वैज्ञानिकांनी.

नेपाळमध्ये बुधवारी पहाटे ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली, गाझियाबाद, गुरुग्राम आणि लखनौसह उत्तर भारतातील काही भागांतही ते जाणवले. नेपाळमधील डोटी जिल्ह्यात घर कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढपासून ९० किमी आग्नेयेला भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी मंगळवारी संध्याकाळी या भागात ४.९ आणि ३.५ रिश्टर स्केलचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते.

नेपाळ हे हिमालयाच्या कवेत वसलेले आहे. येथे हल्ली अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. एप्रिल २०१५ च्या विनाशकारी भूकंपाने नेपाळ हादरला होता. सरकारी आकडेवारी दर्शवते की त्या भूकंपात ८,९६४ लोकांचा मृत्यू झाला आणि २१,९५२ लोक जखमी झाले. हिमालयीन प्रदेशात असा विनाशकारी भूकंप होण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

अंदाज वर्तवणे कठीणहिमालयीन प्रदेशात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता असूनही त्याचा अंदाज वर्तवता येणार नाही आणि हे पाहता घाबरून जाण्याऐवजी शास्त्रज्ञांनी त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. ‘इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील घर्षणामुळे हिमालय अस्तित्वात आला आहे. युरेशियन प्लेटच्या इंडियन प्लेटवरील सातत्याने वाढणाऱ्या दबावामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहगे. त्यातंच परिवर्तन भूकंपात होत असल्याची माहिती, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे वरिष्ठ भूभौतिकशास्त्रज्ञ अजय पॉल यांनी पीटीआयला सांगितले.

काय असेल रिश्टर स्केलवर तीव्रता?अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे भूकंप येणं ही सामान्य आणि सातत्यानं होणारी प्रक्रिया ठरेल. पूर्वेकडील हिमालय क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे आणि या ठिकाणी मोठा भूकंप होण्याची मोठी शक्यता कायमच बनली आहे. हा भूकंप रिश्टर स्केलवर सात किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचीही शक्यता असल्याचे पॉल म्हणाले.

कधी येईल खात्री नाहीभूकंप कधी येईल याचा कोणताही अंदाज बांधता येणार नाही. तो कसा असेल हेदेखील कोणाला माहित नाही. पुढील क्षणालाही भूकंप होऊ शकतो, एका महिन्याने किंवा एका वर्षानेही तो होऊ शकतो किंवा शंभर वर्षानेही. गेल्या दीडशे वर्षांमध्ये या क्षेत्रात चार मोठ्या भूकंपांची नोंद करण्यात आली. १८९७ मध्ये शिलॉंग, १९०५ मध्ये कांगडा, १९३४ मध्ये बिहार-नेपाळ आणि १९५० मध्ये आसामच्या भूकंपाचा समावेश आहे. या सर्व माहितींवरूनही भूकंप कसा असेल याबाबत सांगता येत नाही. १९९१, १९९ आणि २०१५ मध्येही भूकंप आले. याला घाबरण्याऐवजी त्याचा सामना करण्यासाठी योग्य तयारी करावी लागणार आहे. जेणेकरून त्याचं नुकसान कमी होईल, असंही पॉल यांनी स्पष्ट केले.

आतापासून तयारी करा“यासाठी बांधकामांना भूकंपरोधी करण्यात यावं, भूकंप येण्यापूर्वी आणि येण्याच्या वेळी आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या तयारीबाबत लोकांना जागरुक केले जावे. कमीतकमी एका वर्षात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात यावे. जर या गोष्टींकडे लक्ष दिले तर यातून होणारे नुकसान ९९.९९ टक्के कमी करता .येऊ शकते,” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी जपानचे उदाहरणही दिले.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळIndiaभारत