शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

... म्हणून शशी थरूर यांचा पराभव; जी-२३ गटात पडली होती फूट; प्रियांकांचा प्रचारही कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 08:49 IST

Shashi Tharoor : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते.

- आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव होण्यामागे प्रियांका गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचा केलेला प्रचार असल्याची चर्चा आहे. खरगे यांच्या तुलनेत थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली होती.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते. खरगे हे परिवाराचे उमेदवार असल्याचाच संदेश त्यातून गेला होता. या निवडणुकीत स्वतः सोनिया गांधी यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दुसरीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत गुंतलेले होते. 

मात्र, प्रियांका गांधी यांनी खरगे यांच्यासाठी छुपा प्रचार केला आणि त्यांनी जी- २३ गटातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून काँग्रेस हायकमांडचा संदेशही पोहोचवला होता. थरूर यांना पक्षात येऊन दोन दशकेही झाली नसल्याची भावना जी- २३ गटातील नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी थरूर यांना पाठिंबा कसा मिळणार?

जी- २३ मधील नेत्यांनी थरूर यांचे समर्थन का नाही केले?- थरूर यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी कोणत्याही नेत्याशी चर्चा केली नव्हती. त्यापूर्वी गुलाम नबी आझाद आणि कपिल सिबल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. या गटातील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांना हरयाणा काँग्रेसची धुरा देऊन हायकमांडने आपल्या बाजूने करून घेतले होते.- मनीष तिवारी आणि आनंद शर्मा हे दोघेही विदेशी विषयांतील तज्ज्ञ मानले जातात. थरूरही याच विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे तिवारी आणि शर्मा यांच्याकडूनही त्यांना समर्थन मिळणेही दुरापास्त होते.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस