शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही- व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 17:03 IST

इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत.

नवी दिल्ली- इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह अमृतसरला दाखल झाले असून, त्यानंतर ते कोलकात्याकडे रवानाही करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.पत्रकार परिषदेत इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांच्या कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात व्ही. के सिंह यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी मृत कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता तरी तुम्हाला समजलं का ?, मी तर मदतीची घोषणा कशी करू, माझ्या खिशात पेटारा थोडी आहे, असं व्ही. के. सिंह म्हणाले आहेत.जून 2014मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून 40 भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या 39 जणांमध्ये पंजाबचे 27, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील 38 जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले.