शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही- व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 17:03 IST

इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत.

नवी दिल्ली- इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह अमृतसरला दाखल झाले असून, त्यानंतर ते कोलकात्याकडे रवानाही करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.पत्रकार परिषदेत इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांच्या कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात व्ही. के सिंह यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी मृत कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता तरी तुम्हाला समजलं का ?, मी तर मदतीची घोषणा कशी करू, माझ्या खिशात पेटारा थोडी आहे, असं व्ही. के. सिंह म्हणाले आहेत.जून 2014मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून 40 भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या 39 जणांमध्ये पंजाबचे 27, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील 38 जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले.