शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देशातील अनेक भागांत धो-धो पाऊस, बिहारमध्ये ८० लाख लोकांंना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : देशात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे. पूर्वाेत्तर भारताचा काही भाग एक महिन्यापासून पुराचा सामना करीत आहे. राजस्थानात पाऊस आणि पुराने सात जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.बिहारमध्ये पुराचा ८० लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत २५ जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांत मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमध्ये आसामच्या धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास १२ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम तीन जिल्ह्यांसाठी व एसडीआरएफच्या टीम २० जिल्ह्यांसाठी तैनात केल्या आहेत.चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशाच्या काही भागांत १३ आॅगस्टपासून पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयनाची पाणीपातळी वाढली आहे.>आंध्रात अनेक गावे जलमयआंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही जलमय आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि जिल्हाधिकाºयांना निर्देश दिले की, पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी.>उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांत पूरउत्तर प्रदेशात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफ व अन्य अशा एकूण २२ टीम काम करीत आहेत. पूरग्रस्त भागात धान्याचे कीट पुरविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम मध्यप्रदेशात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.