शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:33 IST

देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

नवी दिल्ली- देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत 774 जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात 187, उत्तर प्रदेश 171, पश्चिम बंगाल 170 आणि महाराष्ट्रात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.तर गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22 आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं 245 लोक जखमी झाले आहेत.केरळमध्ये 8 हजार कोटींहून अधिक नुकसानकेरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या 39च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये 20.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात 8 हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात केरळमध्ये अशा प्रकारे कधीही पूरस्थिती उद्भवलेली नव्हती. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मते, आतापर्यंत 8316 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. तर 10 हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर