शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:33 IST

देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

नवी दिल्ली- देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत 774 जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात 187, उत्तर प्रदेश 171, पश्चिम बंगाल 170 आणि महाराष्ट्रात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.तर गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22 आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं 245 लोक जखमी झाले आहेत.केरळमध्ये 8 हजार कोटींहून अधिक नुकसानकेरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या 39च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये 20.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात 8 हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात केरळमध्ये अशा प्रकारे कधीही पूरस्थिती उद्भवलेली नव्हती. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मते, आतापर्यंत 8316 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. तर 10 हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर