शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

"फार बोलता"; गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान खडाजंगी, वकिलाने न्यायमूर्तींनाच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:54 IST

गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

Gujarat High Court: न्यायालयीन कामकाजात न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये सुनावणीदरम्यान अनेकदा चर्चा, वाद विवाद होत असतात. अनेकदा न्यायमूर्ती वकिलांना खडेबोल देखील सुनावतात. मात्र गुजरातमध्ये न्यायालयीन कामाकाजादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. गुजरातमध्ये वकिलांनीच न्यायाधीशांनी सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष असलेले वकील ब्रिजेश त्रिवेदी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयात मुख्य न्यायाधीशांच्या वर्तनावर टीका केली आणि तुम्ही कधीही वरिष्ठ वकिलांना त्यांचे युक्तिवाद पूर्ण करू देत नाहीत, असं म्हटलं.

शुक्रवारी गुजरात हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि हायकोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रिजेश जे त्रिवेदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या वागणुकीवर टीका केली. तुम्ही वकीलांना, विशेषत: ज्येष्ठ वकिलांना त्यांचा युक्तिवाद संपवण्याची संधी देत ​​नाहीत. ही परिस्थिती आपण सहन करत आहोत, पण असे वारंवार घडत असून ते योग्य नाही, असे ब्रिजेश त्रिवेदी म्हणाले.

"इथे सारखं सारखं उलटं होत आहे. न्यायालयाच्या प्रत्येक वरिष्ठ वकिलांनी हे सहन करण्यास अतिशय दया दाखवली आहे. मी २०२३ मध्ये लॉर्ड फ्रान्सिस बेकनचा एक चांगला कोट वापरला होता. मला आता तेच बोलून दाखवायचे नाही. मला आशा आहे की तुमच्या महाराणीच्या ते लक्षात असेल. हे लक्षात ठेवा मी न्यायाधीश नाही, हे अतिशयोक्तीपूर्ण न्यायाधीशांबद्दल आहे," असं वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी म्हटलं.

न्यायाधीश अग्रवाल आणि न्यायमूर्ती प्रणव त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर बेकायदा बांधकामांशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे अधिवक्ता बाजू मांडत होते. त्यावेळी न्यायाधीश अग्रवाल यांनी त्रिवेदी यांना सांगितले की, "कृपया मला माझे म्हणणे पूर्ण करू द्या. मी तुम्हाला काही विचारले होते पण तुम्ही मला माझा प्रश्न पूर्ण करू दिला नाही." त्यावर त्रिवेदी यांनी, "काही हरकत नाही. तुम्ही आदरयुक्त प्रश्न विचारू शकता," असं म्हटलं.

हे प्रकरण वाढले तेव्हा त्रिवेदी यांनी न्यायालयाला प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवण्यास सांगितले. तेव्हा न्यायाधीश अग्रवाल यांनी कोर्टात असा प्रकार व्हायला नको असं म्हटलं. त्यावर त्रिवेदी यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा वेळ हवा आहे असं म्हटलं. यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दुसऱ्या वकिलाने त्रिवेदींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्रिवेदी आपल्या मागणीवर ठाम राहिले.

ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने खटल्यांची सुनावणी करायला हवी ती ही पद्धत नाही. या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती त्रिवेदी यांनी न्यायालयाला केली आणि न्यायालयाची ही वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. प्रकरण आणखी वाढल्यावर त्रिवेदी यांनी न्यायाधीशांवर ‘ओव्हरस्पीकिंग जज’ असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्रिवेदी कोर्टरुममधून बाहेर पडले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGujaratगुजरात