शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"फार बोलता"; गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान खडाजंगी, वकिलाने न्यायमूर्तींनाच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:54 IST

गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

Gujarat High Court: न्यायालयीन कामकाजात न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये सुनावणीदरम्यान अनेकदा चर्चा, वाद विवाद होत असतात. अनेकदा न्यायमूर्ती वकिलांना खडेबोल देखील सुनावतात. मात्र गुजरातमध्ये न्यायालयीन कामाकाजादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. गुजरातमध्ये वकिलांनीच न्यायाधीशांनी सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष असलेले वकील ब्रिजेश त्रिवेदी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयात मुख्य न्यायाधीशांच्या वर्तनावर टीका केली आणि तुम्ही कधीही वरिष्ठ वकिलांना त्यांचे युक्तिवाद पूर्ण करू देत नाहीत, असं म्हटलं.

शुक्रवारी गुजरात हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि हायकोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रिजेश जे त्रिवेदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या वागणुकीवर टीका केली. तुम्ही वकीलांना, विशेषत: ज्येष्ठ वकिलांना त्यांचा युक्तिवाद संपवण्याची संधी देत ​​नाहीत. ही परिस्थिती आपण सहन करत आहोत, पण असे वारंवार घडत असून ते योग्य नाही, असे ब्रिजेश त्रिवेदी म्हणाले.

"इथे सारखं सारखं उलटं होत आहे. न्यायालयाच्या प्रत्येक वरिष्ठ वकिलांनी हे सहन करण्यास अतिशय दया दाखवली आहे. मी २०२३ मध्ये लॉर्ड फ्रान्सिस बेकनचा एक चांगला कोट वापरला होता. मला आता तेच बोलून दाखवायचे नाही. मला आशा आहे की तुमच्या महाराणीच्या ते लक्षात असेल. हे लक्षात ठेवा मी न्यायाधीश नाही, हे अतिशयोक्तीपूर्ण न्यायाधीशांबद्दल आहे," असं वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी म्हटलं.

न्यायाधीश अग्रवाल आणि न्यायमूर्ती प्रणव त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर बेकायदा बांधकामांशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे अधिवक्ता बाजू मांडत होते. त्यावेळी न्यायाधीश अग्रवाल यांनी त्रिवेदी यांना सांगितले की, "कृपया मला माझे म्हणणे पूर्ण करू द्या. मी तुम्हाला काही विचारले होते पण तुम्ही मला माझा प्रश्न पूर्ण करू दिला नाही." त्यावर त्रिवेदी यांनी, "काही हरकत नाही. तुम्ही आदरयुक्त प्रश्न विचारू शकता," असं म्हटलं.

हे प्रकरण वाढले तेव्हा त्रिवेदी यांनी न्यायालयाला प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवण्यास सांगितले. तेव्हा न्यायाधीश अग्रवाल यांनी कोर्टात असा प्रकार व्हायला नको असं म्हटलं. त्यावर त्रिवेदी यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा वेळ हवा आहे असं म्हटलं. यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दुसऱ्या वकिलाने त्रिवेदींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्रिवेदी आपल्या मागणीवर ठाम राहिले.

ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने खटल्यांची सुनावणी करायला हवी ती ही पद्धत नाही. या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती त्रिवेदी यांनी न्यायालयाला केली आणि न्यायालयाची ही वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. प्रकरण आणखी वाढल्यावर त्रिवेदी यांनी न्यायाधीशांवर ‘ओव्हरस्पीकिंग जज’ असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्रिवेदी कोर्टरुममधून बाहेर पडले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGujaratगुजरात