शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात गरमी वाढल्याने विजेची मागणीही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:09 IST

विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती.

नवी दिल्ली : जूनच्या तिस-या आठवड्यात गरमी वाढल्यामुळे देशातील विजेची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्याचा परिणाम म्हणून विजेची मागणी घटली होती. लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात झाल्यामुळे आता विजेची मागणी हळूहळू वाढताना दिसून येत आहे. वास्तविक अजून औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी अजून पूर्णांशाने सुरू झालेल्या नाहीत.जूनच्या पहिल्या सप्ताहात विजेची मागणी १९.७ टक्क्यांनी घटली होती. त्यानंतर मागणी वाढल्याने घसरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही वीज मागणीतील घसरण मे महिन्यातील ८.८ टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत अधिक आहे.वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तिसºया सप्ताहात भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. १५ जूनपासून देशातील वीज मागणी सुमारे १६२ गिगावॅटच्या आसपास आहे. शुक्रवारी १९ जून रोजी ती १६४.६४ गिगावॅटपर्यंत वाढली होती.व्यस्त काळात विजेची शीर्ष मागणी ११ जून रोजी १६३.३0 गिगावॅट होती. १२ जून रोजी ती १५८.0२ गिगावॅट, १३ जून रोजी १५७.७९ गिगावॅट आणि १४ जून रोजी १५६.८८ गिगावॅट होती.या सप्ताहात शीर्ष मागणी १६४.६४ गिगावॅट राहिली. मागील वर्षीच्या जूनमध्ये याच सप्ताहात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ यंदा शीर्ष मागणीत ९.७६ टक्के घसरण झाली आहे. मागणी १५ जून रोजी १६२.३५ गिगावॅट असलेली विजेची शीर्ष मागणी १९ जून रोजी १६४.६४ गिगावॅटवर गेली. ४ जूनला ही मागणी १३८.२८ गिगावॅट आणि ६ जूनला १४६.५३ गिगावॅट होती. अशा प्रकारे या काळात विजेची शीर्ष मागणी १४६.५३ गिगावॅट राहिली. मागील वर्षी जूनच्या याच काळात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ या काळात विजेची शीर्ष मागणी १९.७ टक्क्यांनी घटली आहे.या महिन्याच्या दुसºया सप्ताहात व्यस्त काळात विजेची मागणी पहिल्या सप्ताहातील मागणीच्या तुलनेत १८.७ टक्क्यांवरून घटून १0.५ टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे जूनच्या तिसºया सप्ताहात ती आणखी थोडी कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली.>लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढएका उद्योग विशेषज्ञाने सांगितले की, व्यावसायिक आणि औद्योगिक घडामोडी जशा वाढतील, तशी विजेची मागणी वाढून सामान्य पातळीच्या दिशेने जात राहील.कोविड-१९ विषाणूच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर २0 एप्रिलपासून त्याला शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती.