शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात गरमी वाढल्याने विजेची मागणीही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:09 IST

विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती.

नवी दिल्ली : जूनच्या तिस-या आठवड्यात गरमी वाढल्यामुळे देशातील विजेची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्याचा परिणाम म्हणून विजेची मागणी घटली होती. लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात झाल्यामुळे आता विजेची मागणी हळूहळू वाढताना दिसून येत आहे. वास्तविक अजून औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी अजून पूर्णांशाने सुरू झालेल्या नाहीत.जूनच्या पहिल्या सप्ताहात विजेची मागणी १९.७ टक्क्यांनी घटली होती. त्यानंतर मागणी वाढल्याने घसरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही वीज मागणीतील घसरण मे महिन्यातील ८.८ टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत अधिक आहे.वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तिसºया सप्ताहात भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. १५ जूनपासून देशातील वीज मागणी सुमारे १६२ गिगावॅटच्या आसपास आहे. शुक्रवारी १९ जून रोजी ती १६४.६४ गिगावॅटपर्यंत वाढली होती.व्यस्त काळात विजेची शीर्ष मागणी ११ जून रोजी १६३.३0 गिगावॅट होती. १२ जून रोजी ती १५८.0२ गिगावॅट, १३ जून रोजी १५७.७९ गिगावॅट आणि १४ जून रोजी १५६.८८ गिगावॅट होती.या सप्ताहात शीर्ष मागणी १६४.६४ गिगावॅट राहिली. मागील वर्षीच्या जूनमध्ये याच सप्ताहात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ यंदा शीर्ष मागणीत ९.७६ टक्के घसरण झाली आहे. मागणी १५ जून रोजी १६२.३५ गिगावॅट असलेली विजेची शीर्ष मागणी १९ जून रोजी १६४.६४ गिगावॅटवर गेली. ४ जूनला ही मागणी १३८.२८ गिगावॅट आणि ६ जूनला १४६.५३ गिगावॅट होती. अशा प्रकारे या काळात विजेची शीर्ष मागणी १४६.५३ गिगावॅट राहिली. मागील वर्षी जूनच्या याच काळात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ या काळात विजेची शीर्ष मागणी १९.७ टक्क्यांनी घटली आहे.या महिन्याच्या दुसºया सप्ताहात व्यस्त काळात विजेची मागणी पहिल्या सप्ताहातील मागणीच्या तुलनेत १८.७ टक्क्यांवरून घटून १0.५ टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे जूनच्या तिसºया सप्ताहात ती आणखी थोडी कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली.>लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढएका उद्योग विशेषज्ञाने सांगितले की, व्यावसायिक आणि औद्योगिक घडामोडी जशा वाढतील, तशी विजेची मागणी वाढून सामान्य पातळीच्या दिशेने जात राहील.कोविड-१९ विषाणूच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर २0 एप्रिलपासून त्याला शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती.