शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बिहार अन् पश्चिम बंगालसह ६ राज्यांमध्ये उष्णतेची लाट; ऑरेंज अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:56 IST

वृद्धांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत.

देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

वृद्धांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत. बुधवारपर्यंत देशातील ८ राज्य उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात येतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्याबाबत हवामान खात्याने एक सल्लाही जारी केला आहे. ७ ते ९ जून दरम्यान विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय म्हणाले हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ?

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नरेश कुमार म्हणाले की, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सातत्याने सुरू आहे. या राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. बिहारमधील काही भागात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे, जेथे तापमान सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. आम्ही बिहार आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

डॉ. नरेश कुमार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये तीव्र उष्णतेसोबतच आर्द्रतेचे प्रमाणही खूप जास्त आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारताच्या भागातही येत्या ५ दिवसांत तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे उशीरा आगमन

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.के. जेनमानी म्हणाले की, चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर कधी दाखल होईल, याबाबत आत्ताच आम्ही निश्चित वेळ सांगू शकत नाही. ते म्हणाले की अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास थोडा विलंब झाला आहे.

टॅग्स :Temperatureतापमानwest bengalपश्चिम बंगालBiharबिहार