शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बिहार अन् पश्चिम बंगालसह ६ राज्यांमध्ये उष्णतेची लाट; ऑरेंज अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:56 IST

वृद्धांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत.

देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

वृद्धांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत. बुधवारपर्यंत देशातील ८ राज्य उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात येतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्याबाबत हवामान खात्याने एक सल्लाही जारी केला आहे. ७ ते ९ जून दरम्यान विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय म्हणाले हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ?

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नरेश कुमार म्हणाले की, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सातत्याने सुरू आहे. या राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. बिहारमधील काही भागात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे, जेथे तापमान सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. आम्ही बिहार आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

डॉ. नरेश कुमार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये तीव्र उष्णतेसोबतच आर्द्रतेचे प्रमाणही खूप जास्त आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारताच्या भागातही येत्या ५ दिवसांत तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे उशीरा आगमन

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.के. जेनमानी म्हणाले की, चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर कधी दाखल होईल, याबाबत आत्ताच आम्ही निश्चित वेळ सांगू शकत नाही. ते म्हणाले की अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास थोडा विलंब झाला आहे.

टॅग्स :Temperatureतापमानwest bengalपश्चिम बंगालBiharबिहार