शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ह्दयद्रावक! हातावर लागली मेहंदी, नवरीसारखी सजली; लग्नाच्या दिवशी 'तिची' तिरडी निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 09:42 IST

मृत्यूनंतर कविताचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला. ज्या घरात लग्नाची सनई ऐकायला येणार होती तिथं सन्नाटा पसरला होता

अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहाच्या हसनपूरात गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या २० वर्षीय मुलीचं लग्नाच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही युवती ५ दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर मुरादाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ मार्चला तिचं लग्न होते. परंतु तापामुळे ती रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु ज्यादिवशी तिचं लग्न होते त्याच दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाला धक्का बसला. लग्नाच्या आनंदावर विरजन पडले. 

मिळालेल्या माहितीनुसार, रुस्तमपूर खादर इथं शेतकरी चंदकिरन त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. चंदकिरन वाट्याने शेती करत होते. त्यांची मोठी मुलगी कविता हिचं हसनपूर इथं राहणाऱ्या मिंटूशी लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबाने लग्नाची तारीख निश्चित केली. १५ मार्च रोजी कविता आणि मिंटू दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार होते. परंतु त्याआधीच कविताची तब्येत ढासळली.

कविताला गेल्या ५ दिवसांपासून खूप ताप आला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी मुरादाबादच्या हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. लग्नाची तारीख जवळ येत होती तरीही कविता ताप काही गेला नव्हता. कविताची तब्येत सातत्याने खराब होत चालली होती. त्यामुळे आता तिच्या वाचण्याचे काही अपेक्षा नाही असं डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितले होते. 

कविताची तब्येत आणखी बिघडत गेली आणि अखेर ज्यादिवशी कविताचे लग्न ठरलं होते त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. कविताच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबात शोककळा पसरली, गावकरीही हळहळले. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना अचानक सर्वांच्या आनंदावर विरजन पडले. कविताचं ज्या मिंटूसोबत लग्न होणार होते त्याच्या घरीही शोककळा पसरली. 

नवरीसारखं सजवून तिच्यावर केले अंत्यसंस्कारमृत्यूनंतर कविताचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला. ज्या घरात लग्नाची सनई ऐकायला येणार होती तिथं सन्नाटा पसरला होता. आई वडिलांच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते. त्या परिस्थितीत कविताला नव्या नवरीसारखं सजवण्यात आले. त्यानंतर तिची अंत्ययात्रा निघाली आणि बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :marriageलग्न