शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

हेराल्ड वादळाचे दिल्लीवर ढग ; काँग्रेसचे ‘चलो दिल्ली’

By admin | Updated: December 17, 2015 03:07 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी पतियाळा हाऊस कोर्टात हजर होतील तेव्हा त्यांच्या जामिनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी पतियाळा हाऊस कोर्टात हजर होतील तेव्हा त्यांच्या जामिनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. नॅशनल हेराल्ड खरेदीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरण दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, कार्यकारिणीचे सदस्य, देशभरातील खासदार, आमदार काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या २४ अकबर रोडवर गोळा होत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही राजधानीतील वादळापूर्वीची शांतता असल्याची चाहूल असल्याने केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता आहे. १० जनपथवरून मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार सोनिया आणि राहुल गांधी वैयक्तिक जामीन न मिळवता निर्णय दंडाधिकाऱ्यांवर सोपविणार आहेत. त्यामुळे या दोघांची रवानगी एकतर कारागृहात होईल किंवा सुनावणी पुढील तारखेला निश्चित होईल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हयात असेपर्यंत त्यांचे मदतनीस राहिलेले आर.के. धवन यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर सोनिया गांधी यांनी भर दिला आहे. सरकारने चालविलेल्या राजकीय सूडाचा हा परिणाम असल्यामुळे नॅशनल हेराल्डप्रकरणी राजकीय लढाच दिला जावा, असा सल्ला त्यांना बैठकींच्या मालिकेतून मिळाला असल्याचे समजते. त्या शनिवारी काँग्रेसच्या मुख्यालयातून पतियाळा हाऊस कोर्टाकडे आगेकूच करतील, असे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसच्या कायदाविषयक चमूत सहभागी अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्यासारख्या मातब्बर कायदेतज्ज्ञांनी कायदेशीर डावपेचांबाबत मौन पाळले आहे, तथापि, सोनिया गांधींचे सरकारविरुद्धचे धोरण आक्रमक असेल, हे निश्चित. हेराल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्ष एकजूट दाखवतील तर नव्या ऐक्याला बळकटी लाभेल असे मानले जाते.भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रकरण दाखल केले असून दंडाधिकाऱ्यांनी या खासगी तक्रारीची दखल घेतली आहे.काय होऊ शकणार?नॅशनल हेराल्ड प्रकरणात गुन्हेगारीचा आरोप असल्यामुळे समन्स पाठविण्यात आलेल्यांना वैयक्तिक जामीन मिळवणे क्रमप्राप्त ठरते. अशा व्यक्तींनी जामीन न घेतल्यास कोर्टाकडे त्यांना कारागृहात पाठविण्याचा पर्याय असतो. सुनावणी पुढील तारखेला निश्चित झाल्यास हा प्रसंग टाळता येऊ शकतो. शिवाय फिर्यादी पक्षाने केलेली आरोपींच्या रिमांडची मागणी फेटाळण्याचा मार्ग कोर्टाने स्वीकारला तर तो अप्रत्यक्षरीत्या जामीनच ठरेल. एकंदरीत काँग्रेसची रणनीती गांधींसाठी लाभदायकच ठरणारी दिसते.एसपीजीसमोर सुरक्षेचा पेचसोनिया आणि राहुल गांधी यांना संरक्षण देणाऱ्या विशेष सुरक्षा दलासमोर(एसपीजी)बंदोबस्ताचा प्रश्न उभा ठाकला आहे. सोनिया गांधी १० जनपथहून पायी निघाल्यास संपूर्ण मार्गावर चोख सुरक्षा ठेवावी लागेल. त्यांनी जामीन नाकारल्यास निर्माण होणाऱ्या अभूतपूर्व परिस्थितीत एसपीजीला त्यांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ची व्यवस्था करावी लागेल. यापूर्वी एसपीजीची सुरक्षा असलेले माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना १९९७ मध्ये तीसहजारी न्यायालयात खटल्याला हजर व्हावे लागले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी खटला विज्ञान भवनात हलविण्यात आला होता. १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार असताना इंदिरा गांधी यांना एक रात्र अतिथीगृहात काढावी लागली होती. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने प्रकरण रद्दबातल केले होते. त्यावेळी त्यांच्या या कारावासामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता.