शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्या; राजेश टोपेंची केंद्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 22:48 IST

corona vaccine - देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, याला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देराजेश टोपे यांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेटराज्यातील कोरोना स्थिती आणि लसीकरणावर चर्चाकोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी २.२० कोटी डोस देण्याची विनंती

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. तर, दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचा (corona vaccine) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यातच राज्यासाठी दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (health minister rajesh tope demanding 20 lakh corona vaccine dose for maharashtra for every week)

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) मंगळवारी दिल्लीला गेले होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना आणि लसीकरणाबाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राजेश टोपे यांनी यावेळी केली.

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा!

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता

राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्यासह ६० वर्षांवरील आणि ४५ वयोगटावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्वांना पहिला डोस मे महिन्यापर्यंत तर दुसरा डोस जूनपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी २.२० कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या डोसची आवश्यकता आहे, असे टोपे यांनी सांगितले.

दर आठवड्याला २० लाख कोरोना लसीचे डोस

राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. 

लसीकरण केंद्र उभारण्याची परनवागी द्यावी

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ३६७ खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. कोरोना लसीकरणानंतर आढळून येणाऱ्या दुष्परिणामांची संख्या किरकोळ असून, लसीकरण केंद्रासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे. या निकषातून सवलत देऊन ५० बेड असलेल्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करावे. यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल, असे टोपे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली. मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेCentral Governmentकेंद्र सरकार