शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख उत्तर दिले; पंतप्रधानांचा चीनला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:08 AM

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे,

नवी दिल्ली: भारत जशी मित्रता जपणे जाणतो तसेच डोळ््याला डोळे भिडवून जशास तसे उत्तरही देऊ शकतो. लडाखमध्ये भारतीय भूमीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कणखरपणे प्रत्युत्तर दिले गेले आहे. भारतमातेच्या प्रतिष्ठेस कधीही कमीपणा येऊ दिला जाणार नाही, हे आपल्या शूर सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर कुरापती करणाºया चीनला रविवारी थेट टोला लगावला.

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे, त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. संपूर्ण देश या वीर जवानांचा कृतज्ञ आहे, त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. या जवानांच्या हौतात्म्याने त्यांच्या कुटुंबियांप्राणेच प्रत्येक भारतीय हळहळला आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या बलिदानाविषयी त्यांच्या कुटुंबियांना जो गर्व आहे, देशाप्रती जी निष्ठा आहे तीच देशाची खरी ताकद आहे.

पंतप्रधान म्हणाले की, या शहीद जवानांचे माता-पिता त्यांच्या दुसऱ्या मुलांनाही सैन्यात पाठवायला तयार आहेत. काहींनी तर नातवंडांनाही देशाच्या रक्षणासाठी धाडण्याचे बोलून दाखविले आहे. या शहीद कुटुंबांचा त्याग पूजनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृझनिश्चयाने या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच संकल्प प्रत्येक नागरिकाने त्याच्या जीवनाचे ध्येय बनविण्याची गरजआहे. हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल.

स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हा भारताचा संकल्प आहे. स्वावलंबन हे भारताचे लक्ष्य आहे, विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे व बंधुभाव हाच भारताचा स्थायीभाव आहे. हेच आदर्श समोर ठेवून भारत भविष्यातही वाटचाल करत राहील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

इको फ्रेन्डली गणपतीपाऊस धरतीला पुनरुज्जीवन देतो. पण त्यासाठी आपणही पर्यावरण जपायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही, अशा फक्त ‘इको फ्रेन्डली’ गणेशमूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन केले. तसेच एरवीही पावसाळ््यात अनेक प्रकारच्या साथा पसरत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची अधिक काळजी घेण्याचाही त्यांनी आग्रह धरला.वर्षाचे सुरुवातीचे सहा महिने वाईट गेले म्हणून यंदाचे संपूर्ण वर्षच देशासाठी वाईट आहे, असे मानण्याचे कारण नाही. उलट सन २०२० हे वर्ष या दशकात देशाला नवी दिशा देणारे ठरेल. भारताचा इतिहासच अनेक संकटांवर मात करून अधिक बलशाली होऊन त्यातून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे संकटे आली तेव्हा भारत यातून सावरणार नाही, ही संस्कृती नष्ट होईल, असे अनेकांना वाटले. पण अशा प्रत्येक वेळी भारत अधिक भव्य स्वरूपात बाहेर पडला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन