शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख उत्तर दिले; पंतप्रधानांचा चीनला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 03:08 IST

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे,

नवी दिल्ली: भारत जशी मित्रता जपणे जाणतो तसेच डोळ््याला डोळे भिडवून जशास तसे उत्तरही देऊ शकतो. लडाखमध्ये भारतीय भूमीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कणखरपणे प्रत्युत्तर दिले गेले आहे. भारतमातेच्या प्रतिष्ठेस कधीही कमीपणा येऊ दिला जाणार नाही, हे आपल्या शूर सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर कुरापती करणाºया चीनला रविवारी थेट टोला लगावला.

‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे, त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. संपूर्ण देश या वीर जवानांचा कृतज्ञ आहे, त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. या जवानांच्या हौतात्म्याने त्यांच्या कुटुंबियांप्राणेच प्रत्येक भारतीय हळहळला आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या बलिदानाविषयी त्यांच्या कुटुंबियांना जो गर्व आहे, देशाप्रती जी निष्ठा आहे तीच देशाची खरी ताकद आहे.

पंतप्रधान म्हणाले की, या शहीद जवानांचे माता-पिता त्यांच्या दुसऱ्या मुलांनाही सैन्यात पाठवायला तयार आहेत. काहींनी तर नातवंडांनाही देशाच्या रक्षणासाठी धाडण्याचे बोलून दाखविले आहे. या शहीद कुटुंबांचा त्याग पूजनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृझनिश्चयाने या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच संकल्प प्रत्येक नागरिकाने त्याच्या जीवनाचे ध्येय बनविण्याची गरजआहे. हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल.

स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हा भारताचा संकल्प आहे. स्वावलंबन हे भारताचे लक्ष्य आहे, विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे व बंधुभाव हाच भारताचा स्थायीभाव आहे. हेच आदर्श समोर ठेवून भारत भविष्यातही वाटचाल करत राहील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

इको फ्रेन्डली गणपतीपाऊस धरतीला पुनरुज्जीवन देतो. पण त्यासाठी आपणही पर्यावरण जपायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही, अशा फक्त ‘इको फ्रेन्डली’ गणेशमूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन केले. तसेच एरवीही पावसाळ््यात अनेक प्रकारच्या साथा पसरत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची अधिक काळजी घेण्याचाही त्यांनी आग्रह धरला.वर्षाचे सुरुवातीचे सहा महिने वाईट गेले म्हणून यंदाचे संपूर्ण वर्षच देशासाठी वाईट आहे, असे मानण्याचे कारण नाही. उलट सन २०२० हे वर्ष या दशकात देशाला नवी दिशा देणारे ठरेल. भारताचा इतिहासच अनेक संकटांवर मात करून अधिक बलशाली होऊन त्यातून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे संकटे आली तेव्हा भारत यातून सावरणार नाही, ही संस्कृती नष्ट होईल, असे अनेकांना वाटले. पण अशा प्रत्येक वेळी भारत अधिक भव्य स्वरूपात बाहेर पडला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन