शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; पाकमध्ये गेलेल्या अंजूच्या वडिलांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 08:32 IST

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत.

जयपूर – सीमा हैदर प्रकरण अद्याप शांत झाले नाही तोवर अंजू मीणा हा विषय चर्चेत आला आहे. अंजू तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा इथं पोहचली. हा प्रवास तिने वाघा बॉर्डर क्रॉस करून केला. अंजूने सीमेपलीकडे जाण्याची घटना भारत-पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेत आहे. आता त्यात अंजूचे पिता प्रसाद थॉमस यांचे विधान समोर आले आहे.

प्रसाद थॉमस म्हणाले की, मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले नाही. अंजूनेही कधी वडिलांना कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही त्यामुळे वडीलदेखील तिच्यापासून दूर राहिले. अंजूच्या सनकी स्वभावामुळे तिला सोडून दिले होते. ती बहुतांशवेळा उत्तर प्रदेशातील कैलोर इथं वास्तव्याला होती. अंजूचे वडील ग्वालियरच्या टेकनपूर इथं राहायला होते. मुलीचे उचललेले पाऊल योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मुलगी सनकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खूप वर्षापूर्वी प्रसाद थॉमस यांनी धर्म परिवर्तन केले होते. त्यांनी इसाई धर्माचा स्वीकार केला होता. ज्यानंतर त्यांचे नाव बदलून प्रसाद थॉमस असं करण्यात आले.

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंजू पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे. २१ जुलैला ती पाकिस्तानात पोहचली. मी इथं फिरायला आलेली आहे असं अंजूने म्हटलं. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मी पाकिस्तानात आले. इथं येण्याआधी मी सर्व प्लॅनिंग आणि तयारी करूनच आली आहे.

वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानाच पोहचली

भिवाडीहून पाकिस्तानात कशी पोहचली असा प्रश्न अंजूला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. सुरुवातीला भिवाडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसर, तिथून वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानात कुठे थांबली असं तिला विचारले तेव्हा मी इथं एका मित्राच्या घरी थांबली आहे. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे.

२०२० मध्ये नसरुल्लाहशी ओळख

अंजूचा दावा आहे की, २ वर्षापूर्वी तिची ओळख नसरुल्लाहसोबत झाली. माझी तुलना सीमा हैदरशी करणे चुकीचे आहे. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि पाकिस्तानात सध्या मी सुरक्षित आहे. २०२० मध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सेंज केले. व्हॉट्सअपवर बोलणे होऊ लागले. त्याबाबत आई आणि बहिणीला मी पहिल्याच दिवशी सगळे सांगितले होते असं अंजूने म्हटलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत