शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; पाकमध्ये गेलेल्या अंजूच्या वडिलांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 08:32 IST

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत.

जयपूर – सीमा हैदर प्रकरण अद्याप शांत झाले नाही तोवर अंजू मीणा हा विषय चर्चेत आला आहे. अंजू तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा इथं पोहचली. हा प्रवास तिने वाघा बॉर्डर क्रॉस करून केला. अंजूने सीमेपलीकडे जाण्याची घटना भारत-पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेत आहे. आता त्यात अंजूचे पिता प्रसाद थॉमस यांचे विधान समोर आले आहे.

प्रसाद थॉमस म्हणाले की, मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले नाही. अंजूनेही कधी वडिलांना कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही त्यामुळे वडीलदेखील तिच्यापासून दूर राहिले. अंजूच्या सनकी स्वभावामुळे तिला सोडून दिले होते. ती बहुतांशवेळा उत्तर प्रदेशातील कैलोर इथं वास्तव्याला होती. अंजूचे वडील ग्वालियरच्या टेकनपूर इथं राहायला होते. मुलीचे उचललेले पाऊल योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मुलगी सनकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खूप वर्षापूर्वी प्रसाद थॉमस यांनी धर्म परिवर्तन केले होते. त्यांनी इसाई धर्माचा स्वीकार केला होता. ज्यानंतर त्यांचे नाव बदलून प्रसाद थॉमस असं करण्यात आले.

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंजू पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे. २१ जुलैला ती पाकिस्तानात पोहचली. मी इथं फिरायला आलेली आहे असं अंजूने म्हटलं. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मी पाकिस्तानात आले. इथं येण्याआधी मी सर्व प्लॅनिंग आणि तयारी करूनच आली आहे.

वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानाच पोहचली

भिवाडीहून पाकिस्तानात कशी पोहचली असा प्रश्न अंजूला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. सुरुवातीला भिवाडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसर, तिथून वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानात कुठे थांबली असं तिला विचारले तेव्हा मी इथं एका मित्राच्या घरी थांबली आहे. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे.

२०२० मध्ये नसरुल्लाहशी ओळख

अंजूचा दावा आहे की, २ वर्षापूर्वी तिची ओळख नसरुल्लाहसोबत झाली. माझी तुलना सीमा हैदरशी करणे चुकीचे आहे. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि पाकिस्तानात सध्या मी सुरक्षित आहे. २०२० मध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सेंज केले. व्हॉट्सअपवर बोलणे होऊ लागले. त्याबाबत आई आणि बहिणीला मी पहिल्याच दिवशी सगळे सांगितले होते असं अंजूने म्हटलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत