शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; पाकमध्ये गेलेल्या अंजूच्या वडिलांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 08:32 IST

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत.

जयपूर – सीमा हैदर प्रकरण अद्याप शांत झाले नाही तोवर अंजू मीणा हा विषय चर्चेत आला आहे. अंजू तिचा मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा इथं पोहचली. हा प्रवास तिने वाघा बॉर्डर क्रॉस करून केला. अंजूने सीमेपलीकडे जाण्याची घटना भारत-पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चेत आहे. आता त्यात अंजूचे पिता प्रसाद थॉमस यांचे विधान समोर आले आहे.

प्रसाद थॉमस म्हणाले की, मागील २० वर्षापासून मी अंजूचे तोंडदेखील पाहिले नाही. अंजूनेही कधी वडिलांना कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही त्यामुळे वडीलदेखील तिच्यापासून दूर राहिले. अंजूच्या सनकी स्वभावामुळे तिला सोडून दिले होते. ती बहुतांशवेळा उत्तर प्रदेशातील कैलोर इथं वास्तव्याला होती. अंजूचे वडील ग्वालियरच्या टेकनपूर इथं राहायला होते. मुलीचे उचललेले पाऊल योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत मुलगी सनकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खूप वर्षापूर्वी प्रसाद थॉमस यांनी धर्म परिवर्तन केले होते. त्यांनी इसाई धर्माचा स्वीकार केला होता. ज्यानंतर त्यांचे नाव बदलून प्रसाद थॉमस असं करण्यात आले.

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंजू पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे. २१ जुलैला ती पाकिस्तानात पोहचली. मी इथं फिरायला आलेली आहे असं अंजूने म्हटलं. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मी पाकिस्तानात आले. इथं येण्याआधी मी सर्व प्लॅनिंग आणि तयारी करूनच आली आहे.

वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानाच पोहचली

भिवाडीहून पाकिस्तानात कशी पोहचली असा प्रश्न अंजूला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. सुरुवातीला भिवाडीहून दिल्लीला गेले. त्यानंतर अमृतसर, तिथून वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहचली. पाकिस्तानात कुठे थांबली असं तिला विचारले तेव्हा मी इथं एका मित्राच्या घरी थांबली आहे. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे.

२०२० मध्ये नसरुल्लाहशी ओळख

अंजूचा दावा आहे की, २ वर्षापूर्वी तिची ओळख नसरुल्लाहसोबत झाली. माझी तुलना सीमा हैदरशी करणे चुकीचे आहे. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि पाकिस्तानात सध्या मी सुरक्षित आहे. २०२० मध्ये पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी माझी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत नंबर एक्सेंज केले. व्हॉट्सअपवर बोलणे होऊ लागले. त्याबाबत आई आणि बहिणीला मी पहिल्याच दिवशी सगळे सांगितले होते असं अंजूने म्हटलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत