शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:27 IST

Hathras Stampede : हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे. या दुर्घटनेमागे नवीन थेरी मांडताना ते म्हणाले की, "काही लोकांकडे विषारी स्प्रे होता. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच चेंगराचेंगरी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणात बाबांच्या सत्संगाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे."

रविवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी आरोप केला की, भोले बाबांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ही संपूर्ण घटना एका षड्यंत्राचा भाग म्हणून घडवून आणण्यात आली आहे. "२ जुलै रोजी हाथरस सत्संगाच्या वेळी काही लोकांनी गर्दीत विषारी पदार्थ असलेले कॅन उघडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली."

"१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन सत्संगात आले होते. ते विषारी स्प्रे मारून पळून गेले आणि हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं दिसतं. हे सर्व लोक गाडीतून पळून गेले. अनेक लोक त्यात बेशुद्ध पडले, मी विशेष तपास पथकाला (एसआयटी) विनंती करतो की, या घटनेमागे कोण आहेत याचा तपास करा. घटनेपूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, तरच सूत्रधारांचा शोध लागेल. ही दुर्घटना नाही तर हत्या आहे" असं वकिलाने म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. याशिवाय आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सत्संग आयोजन समितीचे सदस्य होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश