शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:27 IST

Hathras Stampede : हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे. या दुर्घटनेमागे नवीन थेरी मांडताना ते म्हणाले की, "काही लोकांकडे विषारी स्प्रे होता. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच चेंगराचेंगरी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणात बाबांच्या सत्संगाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे."

रविवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी आरोप केला की, भोले बाबांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ही संपूर्ण घटना एका षड्यंत्राचा भाग म्हणून घडवून आणण्यात आली आहे. "२ जुलै रोजी हाथरस सत्संगाच्या वेळी काही लोकांनी गर्दीत विषारी पदार्थ असलेले कॅन उघडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली."

"१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन सत्संगात आले होते. ते विषारी स्प्रे मारून पळून गेले आणि हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं दिसतं. हे सर्व लोक गाडीतून पळून गेले. अनेक लोक त्यात बेशुद्ध पडले, मी विशेष तपास पथकाला (एसआयटी) विनंती करतो की, या घटनेमागे कोण आहेत याचा तपास करा. घटनेपूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, तरच सूत्रधारांचा शोध लागेल. ही दुर्घटना नाही तर हत्या आहे" असं वकिलाने म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. याशिवाय आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सत्संग आयोजन समितीचे सदस्य होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश