शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 09:34 IST

Hathras Stampede : हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

२ जुलै रोजी हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत बाबा एकदाही समोर आले नाहीत. याच दरम्यान भोले बाबांचे वकील ए के सिंह यांनी 'आज तक'वर दावा केला आहे की, बाबा कुठेही लपलेले नाहीत. या घटनेने बाबा खूप दुखावले आहेत. यानंतर भोले बाबांच्या वतीने पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दावा करण्यात आला.

भोले बाबांच्या या दाव्यांचा तपास करण्यासाठी, आज तकच्या टीमने हाथरस, एटा, जालेसर येथे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या पीडित कुटुंबांच्या घरांना भेट दिली. भोले बाबांनी लोकांना मदत केल्याच्या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाबांकडून त्यांच्या घरी काही मदत आली का? बाबांच्या समितीने त्यांच्याशी संपर्कही केला का? या सर्व प्रकाराबाबत लोकांनी माहिती दिली आहे. 

हाथरस घटनेत ६५ वर्षीय चंद्रप्रभा यांना गमावलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी टीम सर्वप्रथम एटाला पोहोचली. येथे राम दास यांनी सांगितलं की, भोले बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, परंतु आजनंतर ते बाबांच्या कोणत्याही सत्संगाला जाणार नाही आणि त्यांचं कधीही ऐकणार नाहीत.

जलेसर राज कुमार यांच्या घरी टीम पोहोचली. राजकुमार मजुरीचे काम करतो आणि बाबांची पूजाही करतो. तो पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी खुशबूसोबत सत्संगाला आला होता. पण सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजपर्यंत बाबांकडून कोणतीही मदत किंवा आश्वासन मिळालेलं नाही. मात्र, सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत मिळत आहे.

एका कुटुंबाची अवस्थाही बिकट असून रडत आहे. इथे एकाच घरातील दोन मुली बाबांच्या सत्संगाला गेल्या होत्या, पण त्या परतल्याच नाहीत. मीरा आणि सुधा अशी मुलींची नावं होती. आज तकशी बोलताना त्यांच्या आईने सांगितलं की, बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, माझ्या दोन्ही मुली गेल्या. सरकारकडून मदत आली आहे, पण बाबांच्या बाजूने कोणीही आलं नाही.

हाथरसमध्ये आता बाबांना देव मानणारे भक्त आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर बाबांना ढोंगी म्हणू लागले आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, "दहा दिवस झाले, ना बाबा आले ना त्यांचं कोणी आलं. बाबा ढोंगी आहेत. बाबा काही चमत्कार करत नाहीत." आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश